सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यातील तणाव तिसऱ्या दिवशीही कायम असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल्याने पुतळ्यासमोर शांततेत पूजा करण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात आली. मात्र, ढोल वाजवण्याच्या मुद्द्यावरून वाद वाढत गेला आणि दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी संतप्त शिवभक्तांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिगेट तोडून पुतळ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यातील तणाव तिसऱ्या दिवशीही कायम असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल्याने पुतळ्यासमोर शांततेत पूजा करण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात आली. मात्र, ढोल वाजवण्याच्या मुद्द्यावरून वाद वाढत गेला आणि दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी संतप्त शिवभक्तांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिगेट तोडून पुतळ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.






