मीरा-भाईंदरच्या जय बजरंग नगरमध्ये अन्नातून विषबाधेची भीषण घटना घडली आहे. एका कुटुंबातील सहा जण आजारी पडले असून केवळ तीन वर्षांच्या दिपाली मोर्या या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रमेश, नीलम आणि राजकुमार मोर्या यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चाहत आणि अनामिका मोर्या यांना प्रकृती गंभीर असल्याने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानत फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे.
मीरा-भाईंदरच्या जय बजरंग नगरमध्ये अन्नातून विषबाधेची भीषण घटना घडली आहे. एका कुटुंबातील सहा जण आजारी पडले असून केवळ तीन वर्षांच्या दिपाली मोर्या या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रमेश, नीलम आणि राजकुमार मोर्या यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चाहत आणि अनामिका मोर्या यांना प्रकृती गंभीर असल्याने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानत फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे.