लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपू लागली आहेत… शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे… शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी आज पाहणी केली… यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांची आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली… पावसाअभावी पिकांची होत असलेली अवस्था गंभीर असूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे अधिकारी नसल्याची टीका धीरज देशमुख यांनी केली… शक्तिपीठ महामार्गाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नोटिसा देण्यासाठी अधिकारी उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी पाहण्यासाठी आणि त्यांच्या बांधावर जाण्यासाठी सरकारकडे अधिकारी नाहीत, असा आरोप त्यांनी केला…सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिका दुटप्पी असून सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीकाही धीरज देशमुख यांनी यावेळी केली… पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपू लागली आहेत… शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे… शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी आज पाहणी केली… यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांची आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली… पावसाअभावी पिकांची होत असलेली अवस्था गंभीर असूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे अधिकारी नसल्याची टीका धीरज देशमुख यांनी केली… शक्तिपीठ महामार्गाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नोटिसा देण्यासाठी अधिकारी उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी पाहण्यासाठी आणि त्यांच्या बांधावर जाण्यासाठी सरकारकडे अधिकारी नाहीत, असा आरोप त्यांनी केला…सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिका दुटप्पी असून सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीकाही धीरज देशमुख यांनी यावेळी केली… पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.