सर्व मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तावडे यांनी स्वागत केले आहे. मात्र, गेल्या वर्षभरात, म्हणजेच २ सप्टेंबर २०२५ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, केवळ ३ हजार ५५३ मराठा समाजातील लोकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ हजार ३७२ जणांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ५० अर्ज प्रलंबित असून, १३१ अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली आहे.ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी, वंशावळ किंवा संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्या सर्व मराठा समाजातील लोकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्यास हरकत नाही. मात्र, जात पडताळणी समितीच्या प्रक्रियेनंतरच हे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरेल, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे म्हणणे आहे.
सर्व मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तावडे यांनी स्वागत केले आहे. मात्र, गेल्या वर्षभरात, म्हणजेच २ सप्टेंबर २०२५ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत, केवळ ३ हजार ५५३ मराठा समाजातील लोकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ हजार ३७२ जणांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ५० अर्ज प्रलंबित असून, १३१ अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली आहे.ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी, वंशावळ किंवा संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्या सर्व मराठा समाजातील लोकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्यास हरकत नाही. मात्र, जात पडताळणी समितीच्या प्रक्रियेनंतरच हे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरेल, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे म्हणणे आहे.