
Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
फक्त पाणी घातलं म्हणजे झाडाला फुलं येतात असं नाही. त्याला पण चांगलं पोषण सुद्धा लागतं. आपण जसं जेवण करतो तसंच झाडाला पण त्याचे जेवण लागते.फुलं कमी का येतात? ऊन, पाणी, माती आणि खत या चार गोष्टी जास्वंदीला फुलं येण्यासाठी चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. झाड हिरवंगार असून सुद्धा फुलं येत नसतील तर खतांमध्ये झाडांना मिळणारी पोषक द्रव्ये कमी आहेत.
जास्वंदीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे तीन घटक सगळ्यात जास्त लागतात. नायट्रोजनने पानं वाढतात आणि फॉस्फरस, पोटॅशियमने फुलं जास्त येतात. त्यामुळे नुसतं एकच खत टाकून उपयोग नसून झाडांना सगळं संतुलित पाहिजे. परंतू जास्त प्रमाणात खत गेले तर झाड पूर्णपणे जळून जाते.
बाहेरून महागडं खत आणायची गरज नाही. घरातल्याच वस्तूंनी तुम्ही खत बनवू शकता. SP GARDENING MARATHI @spgardeningmarathi694 या यूटूब चॅनेलवर असलेल्या व्हिडिओमध्ये की, १ लिटर पाणी घ्यायचं आणि त्यात घरातल्या काही गोष्टी मिक्स करायच्या. यात बेकिंग पावडरचा पण उल्लेख आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे काहीही टाकण्याआधी नीट बघून घ्या. काय टाकताय आणि किती टाकताय हे महत्त्वाचं आहे.घरगुती खत वापरताना नेहमी कमी प्रमाणात सुरुवात करा. Fertilizer Hibuscus Tips:
एकदम बादलीभर टाकू नका. जास्त झालं तर मातीत मीठ वाढतं आणि मुळं खराब होतात. थोडं पाणी झाडाच्या मुळाशी टाका, पानांवर जास्त मारू नका.खत टाकताना या चुका करू नकाअसं नाही की आज खत टाकलं आणि उद्या १०० फुलं आली. झाडाला वेळ लागतो. झाड किती जुनं आहे, कुंडी किती मोठी आहे, माती कशी आहे, ऊन किती मिळतंय या सगळ्यावर फुलं येणं अवलंबून असतं.जर झाड कुंडीत असेल तर सगळ्यात आधी कुंडीला खाली भोक आहे का आणि पाणी निघून जातंय का ते बघा.
२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
कुंडीत पाणी साचून राहिलं तर मुळं सडून जातात. आणि जास्वंदीला रोज भरपूर पाणी लागत नाही परंतू ऊन खूप महत्त्वाचं आहे. फक्त खताने काही होत नाही. जास्वंदीला ऊन खूप लागतं. जर तुम्ही झाड एकदम सावलीत ठेवलं असेल जिथे दिवसभर ऊनच येत नाही, तर फक्त पानं वाढतील, फुलं येणार नाहीत.त्यामुळे झाड अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातले किमान ४-५ तास चांगलं ऊन येईल.
१. झाडाला रोज चांगलं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
२. कुंडीत पाणी साचू देऊ नका.
३. माती एकदम कोरडी पण होऊ देऊ नका.
४. जी फुलं सुकली आहेत ती आणि खराब पानं काढून टाका.
५. माती मधून मधून वर खाली करा.
६. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही नवीन उपाय करत असाल तर आधी थोड्या प्रमाणात करून बघा.नियमित काळजी घेतली तर बाप्पा येईपर्यंत तुमची जास्वंदी नक्कीच फुलांनी भरून जाईल.
Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे