मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर कोसळले आहेत.पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 600 ते 900 रुपये प्रतिक्विटल दर मिळत आहे. तर उत्तम दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त 1500 च्या आसपास भाव मिळाला. उन्हाचा वाढलेला कहर व कोसळलेले भाव, यामुळे कांद्याने पुरती जिरल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत आहे.यंदा खरिपासह रब्बी हंगामातही कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेले. तर भाव कोसळल्याने काढणीस आलेल्या उभ्या कांद्यावर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवल्याचे देखील चित्र आहे.कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या खाली गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे आणि आर्थिक संकट तीव्र झाले आहे. निर्यातीसोबतच देशांतर्गत मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे, मोठ्या खरेदीदारांकडून मागणी घटल्यामुळे बाजारातील दबाव आणखी वाढलाय. याचा थेट परिणाम घाऊक दरांवर झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर कोसळले आहेत.पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 600 ते 900 रुपये प्रतिक्विटल दर मिळत आहे. तर उत्तम दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त 1500 च्या आसपास भाव मिळाला. उन्हाचा वाढलेला कहर व कोसळलेले भाव, यामुळे कांद्याने पुरती जिरल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत आहे.यंदा खरिपासह रब्बी हंगामातही कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेले. तर भाव कोसळल्याने काढणीस आलेल्या उभ्या कांद्यावर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवल्याचे देखील चित्र आहे.कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या खाली गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे आणि आर्थिक संकट तीव्र झाले आहे. निर्यातीसोबतच देशांतर्गत मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे, मोठ्या खरेदीदारांकडून मागणी घटल्यामुळे बाजारातील दबाव आणखी वाढलाय. याचा थेट परिणाम घाऊक दरांवर झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.