संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे गेल्या तीन वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करावे आणि पाणी प्रश्न सोडवावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या अवैध दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा संताप महिलांनी व्यक्त केला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोकुळ नाईकवाडी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व संबंधित दुकान बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासकीय दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे गेल्या तीन वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करावे आणि पाणी प्रश्न सोडवावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या अवैध दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा संताप महिलांनी व्यक्त केला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोकुळ नाईकवाडी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व संबंधित दुकान बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासकीय दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.