मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा आणि केजचे बीडिओ विठ्ठल नागरगोजे यांच्यावर झालेल्या आरोपांना तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. शासनाने अभियानाच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतलेला असताना काही व्यक्तींकडून केले जाणारे आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने आर्थिक मागणी केली नसून गुणवत्तापूर्ण कामालाच पुरस्कार मिळाला आहे असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, अभियानाचा ‘पांचट राज’ असा उल्लेख करून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा अवमान केल्याची खंत व्यक्त केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा आणि केजचे बीडिओ विठ्ठल नागरगोजे यांच्यावर झालेल्या आरोपांना तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. शासनाने अभियानाच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतलेला असताना काही व्यक्तींकडून केले जाणारे आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने आर्थिक मागणी केली नसून गुणवत्तापूर्ण कामालाच पुरस्कार मिळाला आहे असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, अभियानाचा ‘पांचट राज’ असा उल्लेख करून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा अवमान केल्याची खंत व्यक्त केली.






