जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून धीरज गावड, भावेश चुरी आणि जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील दोन वर्षांपासून निधीअभावी 24 योजना बंद असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन छेडले आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पालघर विभाग) यांनी मनसेला पत्राद्वारे स्पष्टीकरण देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. संबंधित पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 26 योजनांची कामे सुरू असून त्यासाठी 1178.25 लाखांचा अंदाजपत्रकीय निधी आहे. यापैकी आतापर्यंत 716.46 लाखांचा खर्च करण्यात आला असून कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून धीरज गावड, भावेश चुरी आणि जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील दोन वर्षांपासून निधीअभावी 24 योजना बंद असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन छेडले आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पालघर विभाग) यांनी मनसेला पत्राद्वारे स्पष्टीकरण देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. संबंधित पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 26 योजनांची कामे सुरू असून त्यासाठी 1178.25 लाखांचा अंदाजपत्रकीय निधी आहे. यापैकी आतापर्यंत 716.46 लाखांचा खर्च करण्यात आला असून कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.