वसईतील माणिकपूर नाका परिसरातील रस्ता सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. फुट्यार्डो इमारतीसमोर पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर बारीक खडी साचली आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे टायर घसरून वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या दीड महिन्यात अनेक जण जखमी झाले असून, नुकतेच दोन स्कूटी अपघात सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, या समस्येविरोधात शिवसेना (उबाठा) गट आंदोलनाच्या तयारीत आहे.
वसईतील माणिकपूर नाका परिसरातील रस्ता सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. फुट्यार्डो इमारतीसमोर पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर बारीक खडी साचली आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे टायर घसरून वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या दीड महिन्यात अनेक जण जखमी झाले असून, नुकतेच दोन स्कूटी अपघात सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, या समस्येविरोधात शिवसेना (उबाठा) गट आंदोलनाच्या तयारीत आहे.