Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

China on India-Pakistan Conflict : ट्रम्पनंतर आता चीनने पाकिस्तानला पाठिंबा देत भारत-पाक युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. पण भारताने हा दावा फेटाळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 31, 2025 | 10:00 AM
China Foregin Minister Wang Yi

China Foregin Minister Wang Yi

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्पनंतर चीनचा बनला पाकिस्तानचा पाठीराखा
  • भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा वागं यी यांचा दावा
  • सत्य काय?
China on India-Pakistan Ceasefire : बीजिंग : भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मध्ये पाकिस्तानचा (Pakistan) खरा दहशतवादी चेहरा उघड केला होता. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती. यावेळी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस तीव्र संघर्ष झाला होता.

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात खाऊनही पाकिस्तानला लाज नाही; आता चिनी शस्त्रांबाबत केला हा दावा

दरम्यान दोन्ही देशांतील युद्धबंदीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा दावा केला होता. त्यांच्यामुळेच भारत-पाक संघर्ष थांबल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु भारताने हा दावा स्पष्टपणे फेटाळला होता. परंतु आता चीन देखील पाकिस्तानचा पाठीराखा बनला आहे. चीनने देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणली असल्याचा दावा केला आहे.

चीनचा खळबळजनक दावा

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. मंगळवारी त्यांनी जागतिक मंचावर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा चीनने मध्यस्थी केलेल्या संवेदनशील मुद्यांपैकी होता असे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनच्या परराष्ट्र संबंधावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहग यांनी, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरप अनेक युद्धे आणि सीमापार संघर्ष सुरु झाल्याचे म्हटले. यामुळे सर्वत्र अशांतता पसरली होती, आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यावर चीनने लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी सांगितले की, आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा अणुप्रश्न, पाकिस्तान आणि भारत तणाव, पॅलेस्टाईन-इस्रायल आणि कंबोडिया-थायलंड संघर्षात मध्यस्थी केली आहे.

काय आहे भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे वास्तव?

पहलगाम हल्ल्यासाठी (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले होते. भारताच्या मते, पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याने हे दहशतवादी हल्ले होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला धझडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामुळे संतापून पाकिस्तानने देखील भारतावर हल्ले सुरु केले. पण भारताने प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. दोन्ही देशात जवळपास चार दिवस संघर्ष सुरु होता.

दरम्यान भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने हल्ल्यांना घाबरुन युद्धबंदीची विनंती केली होती. या विनंतीवरुन विनंतीवरुन दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी (DGMO) थेट चर्चा केवली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली. या युद्धबंदीमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसल्याचे भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. भारताने ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या मध्यस्थीनेचा दावाही फेटाळला आहे. तसेच चीनचाही दावा भारताने फेटाळला आहे.

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने भारत-पाक संघर्षावर काय दावा केला आहे?

    Ans: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. परंतु भारताने हा दावा फेटाळला

  • Que: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी नेमकी कशी झाली?

    Ans: भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी (DGMO) थेट चर्चा केवली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली.

  • Que: भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर ट्रम्प यांनी काय दावा केला होता?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, त्यांनी दोन्ही देशाच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यांना युद्ध थांबवले नाहीतर जास्त टॅरिफची धमकी दिली. यामुळे दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार झाले.

Web Title: After trump china mediate between india pakistan conflict says foregin minister wang yi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • Operation Sindoor
  • World news

संबंधित बातम्या

Khaleda Zia यांच्यावर आज अत्यसंस्कार; भारताकडून जयशंकर उपस्थित, तर पाकिस्तानकडून कोण?
1

Khaleda Zia यांच्यावर आज अत्यसंस्कार; भारताकडून जयशंकर उपस्थित, तर पाकिस्तानकडून कोण?

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल
2

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 
3

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
4

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.