
NSA Ajit Doval Russia Visit
अजित डोवाल यांनी परिषदेत म्हटले की, दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरोधात निर्णायक कारवाई करायची हे प्रत्येक राष्ट्रांनी स्वत:च ठरवले पाहिजे. तसेच भारताची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, आम्ही दहशतावादाविरोधात कोणताही मापदंड खपून घेणार नाही हेही स्पष्ट केले. तसचे त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी असेही आवाहन केले. त्यांच्या या शब्दातून थेट पाकिस्तानला उद्देशून म्हटले असल्याचे मानले जात आहे.
डोवाल यांनी १९४५ मध्ये स्थापन झालेल्या जागतिक संरचना आणि संस्थांमध्ये आमूलाग्र बदलाची गरज देखील अधोरेखित केली. या बदलांमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देता येईल असे त्यांनी म्हटले. बहुध्रुवीय जगाच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने आणि धोके ओळखून यामध्ये बदल करण्यात यावा हे डोवाल यांनी अधोरेखित केले.
त्यांनी दहशतवादाला नष्ट करण्यासाठी रशिया(Russia)प्रमाणेच केला जाईल असे म्हटले. भारत देखील दहशतवादाला मूळापासून उखडून टाकण्यासाठी वचनबद्ध आहोत हे त्यांनी स्पष्ट केले. रशियाची दहशतवादाविरोधी धोरण अत्यंत आक्रमक, कठोर आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करणाऱ्या आहे. असेही भारताचे सून्य सहनशीलता धोरण आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध असताना डोवाल यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या परिषदेत भारत आणि पाकिस्तान एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे रशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये चर्चेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या परिषदेनंतर डोवाल यांनी रशियासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकही घेतली. अद्याप यांचे तपशील समोर आलेली नाहीत. परंतु सुत्रांनुसार, संरक्षण सहकार्य, तेल खरेदी बाबत आणि S-400 या सुरक्षा प्रणालीच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
🚨🇮🇳🇷🇺 India and Russia will fight terrorism with all their might: NSA Doval “We lost 26 innocent lives in a tourist state… and we are committed — as you are — to crush terrorism completely.” NSA Ajit Doval to Russian Security Council Secretary Sergei Shoigu. pic.twitter.com/RclwUlyp1R — Sputnik India (@Sputnik_India) May 28, 2026
UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा
Ans: रशियात आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला गेला होते.
Ans: डोवाल यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेतून दहशतवादावर भारताच्या शून्य सहनशीलतेचे धोरण स्पष्ट केले.
Ans: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध असताना डोवाल यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.