
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) सराकराच्या पतनानंतर युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापन झाला होती. दीड वर्षानंतर पुन्हा लोकशाही सरकारची स्थापना झाली आहे. मात्र अंतरिम सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे देश मागे पडला आहे. नुकतेच बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळाचा कच्चा चिठ्ठा जगासमोर मांडला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
एका बांगलादेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी, ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2026 चा काळा त्यांच्यासाठी अत्यंत कठीण काळ होता असे सांगितले. त्यांनी सांगितले की, हसीनांनी देश सोडल्यानंतर युनूस सरकारने राष्ट्रपतींना पदावरुन हटवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे अधिकार केवळ राष्ट्रपती भवनापूरते मर्यादित ठेवण्यात आले. तसेच कतार, कोवासचे दौरेही रद्द केले गेले. याशिवाय त्यांना प्रेस रिलीज करण्याची परवानगी देखील नव्हती, असे शहाबुद्दीन यांनी म्हटले.
राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या आरोपांनुसार, युनूस यांनी संविधानीतल तरतुदींचे उल्लंघन करुन अध्यादेश जारी केले. त्यांनी गेल्या वर्षात एकदाही राष्ट्रपतींची भेट घेतली नाही, त्यांना कोणत्याही कराराची माहिती दिली नाही. तसेच मुख्य न्यायाधीशांच्या मदतीने असंवैधानिक मार्गाने त्यांना पदावरुन हटवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा शहाबुद्दीन यांनी केला. युनूस यांनी त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला तसेच त्यांच्या विरोधात आंदोलनेही घडवून आणली.
दरम्यान त्यांनी बीएनपीच्या नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की, या कठीण काळात बीएनपीचे तारिक रहमान (Tarique Rahman) त्यांच्या पाठिशी उभे राहिले. संविधान आणि लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी रहमान यांनी मदत केली असल्याचे शहबुद्दीन यांनी म्हटले. सध्या राष्ट्रपतींच्या युनूस यांच्यावरील आरोपांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे बांगलादेश राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे.
Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन