Former Prime Minister Sheikh Hasina's Awami League party victory in the District Bar Association elections
ढाका: बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापन झाली. त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. दरम्यान आता बांगलादेशात लवकरच निवडणुका होणार आहेत. यावेळी बांगलादेशच्या चपैनवाबगेज येथे काल झालेल्या जिल्हा वकिल संघ (बार असोसिएशन) निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.
यामुळे सध्या सत्तेवर असलेल्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला मोठा झटका बसला आहे. देशाचील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
बार असोसिएशन निवडणुकीचे निकाल
चपैनवाबगंज जिल्हा वकील असोसिएशनची कार्यकारी समिती निवडण्यासाठी सोमवारी (24 फेब्रुवारी) मतदान पार पडले. सकाली 10 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आणि 3 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री 8.30 वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये अवामी लीद समर्थित पॅलने विजय मिळवला. या निवडणुकीत 3 पॅनल आणि काही अपक्ष उमेदवारांसह एकूण 34 उमेदवार होते. अवानी लीग समर्थित “मनिरुल-डोलर परिषद” या पॅनलने 6 पदे जिंकली.
राजकीय परिणाम
या निकालामुळे सध्या बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. वकिल संघटनेच्या या निवडणुकीला देशाच्या एकूण राजकीय वातावरणाचे प्रतिक मानले जाते. मोहम्मद युनूस यांच्या सरकारविरोधात वाढणार रोष यामुळे स्पष्ट झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही निकाल पुढील सामान्य निवडणुकांवरही परिणाम करु शकतो. सध्या या निकालामुळे मोहम्मद युनूस सरकारमध्ये टेन्शन वाढले आहे.
नवीन पक्षाची स्थापना आणि नवी रणनिती
दुसरीकडे, शेख हसीना यांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या आणि त्यांच्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या तीन आठवड्यामध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या हालचालींमध्ये बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांची भूमिका असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण युनूस यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांना थेट राजकारणात प्रवेश करायचा नाही.
नवा पक्ष आणि आगामी निवडणुका
येत्या दोन दिवसांत नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलादेशच्या राजकीय वातावरणात मोठे बदल होऊ शकतात. मात्र, निवडणुका कधी होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. युनूस यांनी 2025 च्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात, असे सांगितेल आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या युवक नेतृत्वाच्या पक्षामुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होतील.