भारताचा बांगलादेशला झटका: ट्रान्सशिपमेंट करार रद्द, आर्थिक नुकसान अनिवार्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारत सरकारने बांगलादेशला मोठा धक्का देणारा निर्णय घेत ‘ट्रान्सशिपमेंट’ करार रद्द केला आहे. या निर्णयामुळे बांगलादेश भारतीय भूपृष्ठ मार्ग व भारतीय विमानतळांचा वापर करून नेपाळ, भूतान आणि म्यानमारला वस्तू निर्यात करू शकणार नाही. यामुळे बांगलादेशला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
भारत सरकारच्या या कठोर निर्णयामागे बांगलादेश सरकारच्या अलीकडील भारतविरोधी भूमिकेचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी चीनची स्तुती करताना बांगलादेशला चीनच्या विस्तारित क्षेत्राचा भाग समजावे, अशी टीका केली होती. तसेच त्यांनी चितगावच्या सागरी बेटाचा चीनने विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून वापर करावा, अशी वादग्रस्त सूचना दिली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका-चीन Tariff War घमासान; कोण घेणार माघार अन् वरचढ?
युनुस यांनी त्यांच्या वक्तव्यात भारतातील अत्यंत संवेदनशील क्षेत्र ‘चिकननेक’ (सिलिगुडी कॉरिडॉर) चा उल्लेख केला होता. हे क्षेत्र भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य भागाशी जोडणारे महत्त्वाचे भौगोलिक स्थान आहे. युनुस यांच्या विधानानुसार, “भारताच्या पूर्वेकडील राज्यांकडे सागरी किनारे नाहीत आणि त्यांना व्यापारासाठी बांगलादेशावरच अवलंबून राहावे लागते.” या विधानामुळे भारत सरकारच्या सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आणि बांगलादेशची भूमिकाच चीनला निमंत्रण देणारी आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे भारताने तातडीने ट्रान्सशिपमेंट करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.
#BreakingNews
India has unilaterally canceled the transshipment agreement to Nepal, Bhutan & Myanmar to restrict Bangladesh’s trade growth.Yet, India itself is using free transit and corridor through the heart of Bangladesh.
This shows how petty and narrow-minded some people… pic.twitter.com/6X7hZd8lkd
— Kedar (@Kedar_speaks88) April 9, 2025
credit : social media
या निर्णयामुळे बांगलादेशचा वस्त्र निर्यात उद्योग मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. भारताच्या टेक्सटाईल आणि रेडिमेड गारमेंट उद्योगाला या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. भारत आता स्वतःच्या भूपृष्ठ मार्गांचा अधिक परिणामकारक वापर करून, बांगलादेशच्या जागेवर नवीन बाजारपेठांमध्ये घुसखोरी करू शकतो. विशेषत: बांगलादेशच्या वस्त्र निर्यातीचा मोठा हिस्सा भारतातून होणाऱ्या ट्रान्सशिपमेंटवर अवलंबून होता. आता ही सुविधा बंद झाल्यामुळे बांगलादेशची निर्यात विस्कळीत होणार असून, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.
बांगलादेशकडून अलीकडे चीन आणि पाकिस्तानसोबत वाढती जवळीक भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. भारतासारख्या मोठ्या आणि शक्तिशाली शेजारी देशाच्या असंतोषाकडे दुर्लक्ष करून बांगलादेश जी भूमिका घेत आहे, ती त्यांच्याच हिताविरुद्ध ठरणार आहे. याशिवाय, बिमस्टेक शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनुस यांची भेट झाली होती. या भेटीत भारताने बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. मोदींनी स्पष्ट शब्दांत या हल्ल्यांना आळा घालण्याची सूचना केली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डॉलर घसरला! अमेरिकेन अर्थव्यवस्था धोक्यात, ट्रम्पची टॅरिफ योजना ठरतेय एक मोठे जागतिक संकट
भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे बांगलादेशच्या नेतृत्वाला आता हे लक्षात येईल की, शेजारी देशाशी असलेले संबंध आणि त्यांच्या सुरक्षेचा आदर राखणे किती महत्त्वाचे असते. मोहम्मद युनुस यांचे बेजबाबदार आणि आपत्तीजनक वक्तव्य केवळ त्यांच्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला धक्का पोहोचवत नाही, तर बांगलादेशच्या व्यापारी हितांनाही धोक्यात आणते. भारताने ‘ट्रान्सशिपमेंट’ करार रद्द करून बांगलादेशला एक प्रकारचा धडा शिकवला आहे. की चीनच्या जवळीकेतून शहाणपण न गमावता, भूपोलिटिकदृष्ट्या भारताशी सहकार्य ठेवणे अधिक हिताचे ठरते.
बांगलादेशच्या अविचारी धोरणाचा फटका त्यांच्या अर्थव्यवस्थेलाही बसणार हे आता स्पष्ट झाले आहे.