Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-चीन संबंध सकारात्मकतेच्या दिशने; कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होणार, विमानसेवाही पूर्ववत

भारत-चीन संबंध आता सकारात्मकतेच्या दिशेने वळत आहेत. भारत आणि चीनने 2020 पासून थांबवलेल्या मानसरोवर यात्रेचा पुन्हा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही देशांत थेट विमानसेवाही पूर्ववत होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2025 | 03:20 PM
India China to resume Kailash Mansarovar Yatra direct flights in 2025

India China to resume Kailash Mansarovar Yatra direct flights in 2025

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत-चीन संबंध आता सकारात्मकतेच्या दिशेने वळत आहेत. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांनी आणखी एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. भारत आणि चीनने 2020 पासून थांबवलेल्या मानसरोवर यात्रेचा पुन्हा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही देशांत थेट विमानसेवाही पूर्ववत होणार आहे. हा निर्णय भारताच्या परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. विक्रम मिस्री यांनी बिजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती.

वांग यी यांच्याशी भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असून परराष्ट्र मंत्रालयाने या मानसरोवर यात्रेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि पद्धतींची चर्चा संबंधित यंत्रणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, भारत-चीन तज्ज्ञ स्तरावरील यंत्रणेची लवकरच बैठक होणार असून सीमा ओलांडून जाणाऱ्या नद्यांच्या संदर्भातील जलविद्युत आकडेवारीची देवाणघेवाण आणि इतर सहकार्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- NIA लवकरच अमेरिकेला जाणार; मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु

दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे सुरु होणार

तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय, माध्यमे आणि विचारमंथन गटांद्वारे भारत-चीन लोकांमधील संपर्क वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “कार्यशील दळवळणासाठी आधुनिक यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. हळूहळू या संवादांना पुन्हा सुरू करून प्राधान्याच्या क्षेत्रांवर चर्चा करण्याचे ठरले. याशिवाय आर्थिक आणि व्यापार क्षेत्रातील विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करून दीर्घकालीन धोरणात्मक पारदर्शकता आणि स्थिरता वाढवण्यावर भर देण्यात आला.”

विक्रम मिस्रींचा दोन दिवसीय चीन दौरा

सध्या भारताचे परराष्ट्र सिचव विक्रम मिस्री हे परराष्ट्र सचिव-उपमंत्री यंत्रणेच्या बैठकीसाठी दोन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यावर आहेत. या यंत्रणेच्या पुर्नस्थापनेचा उद्देश भारत-चीन संबंधांच्या पुढील टप्प्यांवर चर्चा करणे आहे. यात राजकीय, आर्थिक आणि लोकांमधील संवाद यांचा समावेश आहे.

भारत-चीन संबंध सामान्य होण्यासाठी सीमेवरील शांतता आवश्यक असल्याचे भारताने नेहमीच म्हटले आहे. डेमचोक आणि डेपसांग या भागांतील सैन्य माघारीच्या प्रक्रियेच्या पूर्णतेनंतर चार-साडेचार वर्षांनंतर भारतीय आणि चीनी सैन्यांनी पुन्हा गस्त घालणे सुरू केले आहे. यामुळे भारत आणि चीन मधील हा निर्णय विश्वास आणि सहकार्य वाढवण्याच्या दिशेन महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी, भारत आणि चीनमधील संबंधांचे सुधार व विकास हे दोन्ही देशांच्या आणि त्यांच्या नागरिकांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावर देशांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात याचा हातभार लागेल असेही ते म्हणाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मोदी योग्य तो निर्णय घेतील’; अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

Web Title: India china to resume kailash mansarovar yatra direct flights in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • China
  • india
  • kailas mansarovar yatra
  • World news

संबंधित बातम्या

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले
1

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
2

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश
3

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
4

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.