India-Pakistan Ceasefire Reaction of major countries on the India-Pakistan ceasefire
नवी दिल्ली: पहलगाच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (10 मे) युद्धबंदीचा करार झाला. याअंतर्गत दोन्ही देशांनी सर्व प्रकारची लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीची घोषणा केली.
दरम्यान या युद्धबंदीनंतर ब्रिटन, जर्मनी, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन यांसारख्या देशांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्व देशांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराचे स्वागत केले आहे. आपण जाणून घेऊयात कोणता देश काय म्हणला.
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीला जर्मनीने एक महत्वाचे आणि सकारात्मक पाऊल म्हटले आहे. जर्मनीने म्हटले की, दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. आता दोन्ही देशांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. ही युद्धबंदी तणाव कमी करण्यासाठी महत्वाची ठरेल.
The ceasefire agreed between #India and #Pakistan is a first, important step out of the escalation spiral. Dialogue is key. The German government has been in contact with both sides in the past days.
— GermanForeignOffice (@GermanyDiplo) May 10, 2025
युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे अधिकारी काजा कल्लास यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तानने तमाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच त्यांनी यासंबंधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केल्याचेही म्हटले.
Just spoke again with @DrSJaishankar and @MIshaqDar50.
The announced ceasefire between India and Pakistan is a vital step toward de-escalation. All efforts must be made to ensure it is respected.
The EU remains committed to peace, stability, and counter-terrorism in the region.
— Kaja Kallas (@kajakallas) May 10, 2025
सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांमधील शांतत प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
#Statement | The Foreign Ministry welcomes the ceasefire agreement between the Islamic Republic of #Pakistan and the Republic of #India, optimistic that it will restore security and peace in the region. pic.twitter.com/f6AOefL9d1
— Foreign Ministry 🇸🇦 (@KSAmofaEN) May 10, 2025
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी तणाव कमी करण्यासाठी हे पाऊल सर्वांच्या हिताचे आहे असे म्हटले आहे.
Today’s ceasefire between India and Pakistan is hugely welcome.
I urge both parties to sustain this. De-escalation is in everybody’s interest.
— David Lammy (@DavidLammy) May 10, 2025
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही देशाच्या डीजीएमओनी चर्चा केली. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केली. परंतु त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हल्ला केला. तसेच गुजरातच्या कच्छमध्येही हल्ला केला. परंतु भारताने या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.