Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त

India Pakistan Conflict : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील स्फोटानंतर आणि इस्लामाबाद स्फोटानंतर हा तणाव वाढला आहे. दोन्ही देशांतील सिंधु पाणी कराराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 12, 2025 | 03:44 PM
India Pakistan News

India Pakistan News

Follow Us
Follow Us:
  • सिंधू पाणी करारवर व्हिएन्नामध्ये होणार कार्यवाही
  • भारताने सहभागी होण्यास दिला नकार
  • पाकिस्तानने व्यक्त केली नाराजी
India Pakistan News in Marathi : इस्लामाबाद/नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.  सिंधू पाणी कराराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून यावर व्हिएन्नामध्ये कार्यवाही होणार आहे. परंतु या कार्यवाहीला उपस्थित राहण्यास भारताने नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, येत्या आठवड्यात १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान व्हिएन्नामध्ये सिंधू पाणी करारावर कार्यवाही होईल. यासाठी पाकिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे, मात्र भारताने यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानन हा करार पुन्हा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा सतत उपस्थित करत आहे. पण भारताने यावर बोलण्यास नकार दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सिंधु पाणी करार स्थगित

२२ एप्रिल २०२५ रोजी भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये अनेक निरापराध लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सबक म्हणून सिंधू पाणी करार स्थगित केला होता. यानंतर पाकिस्तानने हे प्रकरण लवाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेते होते. परंतु भारताने न्यायालयाने निर्णय नाकारले होते. सध्या पुन्हा एकदा पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित केला असून व्हिएन्नामध्ये कार्यवाहीची घोषणा केली आहे.

काय आहे सिंधु जल करार?

भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाते. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण आहे. पण पहलगाम हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरत हा करार स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे.

करार स्थगित झाल्यापासून पाकिस्तानने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा करार पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु यावर त्यांना निराशा मिळत आहे. भारताने हा करार पुन्हा पुनर्सुचित करण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवादविरोधी भूमिका घेण्यास आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पण अद्याप दहशतवादवर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही.

शिवाय नुकतेच भारताच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला होता. यामध्ये १३ जणांच्या मृत्यूची नोंद तर २० हून अधिक जखमी झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांपैकी एकाचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय या हल्ल्याच्या एक दिवसानंतप पाकिस्तानच्या राजधानीमध्ये देखील असाच स्फोट झाला, ज्यासाठी भारताला जबाबदार धरण्यात आले. यामुळे पुन्हा दोन्ही देशातील तणाव वाढला आहे.

Indus Waters Treaty : भारत खरंच सिंधू नदीचं पाणी रोखेल का? सरकारच्या दाव्यात किती तथ्य? वाचा सविस्तर

Web Title: India pakistan conflict indus water treaty proceeding in vienna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Indus Water Treaty
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
1

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO
2

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.