Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan War: काश्मीरमध्ये भारत काय करतोय? ज्याला पाकिस्तान म्हणतोय ‘धोकादायक शस्त्र’; शाहबाज शरीफची पाचावर धारण

Indus Water Treaty: गेल्या वर्षी पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने जम्मू आणि काश्मीरमधील नदी प्रकल्पांना गती दिली आहे. भारताच्या धरण प्रकल्पांबद्दल पाकिस्तानची चिंता वाढत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 12:13 PM
india pakistan water dispute kashmir dam projects shahbaz sharif tension 60 billion dollars

india pakistan water dispute kashmir dam projects shahbaz sharif tension 60 billion dollars

Follow Us
Close
Follow Us:
  • पाण्याचे महायुद्ध
  • पाकिस्तानचा ‘धोकादायक शस्त्र’ असा दावा
  • अस्तित्वाचा प्रश्न

India Pakistan water dispute 2026 news : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan water dispute 2026) यांच्यातील तणाव आता केवळ सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो ‘पाण्या’वरून पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी भारताने सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये नद्यांवर वेगाने धरणे आणि जलसंचय प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. भारताची ही वाढती ताकद पाहून पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तिथले लष्करी अधिकारी भारताच्या या जलप्रकल्पांना “धोकादायक शस्त्र” (Dangerous Weapon) म्हणू लागले आहेत.

६० अब्ज डॉलर्सचा ‘काश्मिरी’ मास्टरस्ट्रोक

भारत जम्मू-काश्मीरमधून वाहणाऱ्या झेलम आणि चिनाब या दोन प्रमुख पश्चिम नद्यांवर प्रचंड मोठे जलसंचय प्रकल्प राबवत आहे. यामध्ये सुमारे ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे भारताला या नद्यांच्या पाण्यावर अधिक नियंत्रण मिळणार आहे. पाकिस्तानी मीडिया ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताची ही वाढती क्षमता पाकिस्तानसाठी अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. भारताने ठरवले तर ते पाकिस्तानकडे जाणारे पाणी पूर्णपणे रोखू शकतात किंवा गरजेपेक्षा जास्त सोडून तिथे पूर आणू शकतात, असा दावा पाकिस्तान करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

१५ वरून ६० दिवसांचा प्रवास: पाकिस्तानची भीती काय?

पाकिस्तानच्या जल आणि वीज विकास प्राधिकरणाचे (WAPDA) अध्यक्ष निवृत्त लेफ्टनंत जनरल मोहम्मद सईद यांनी नुकत्याच एका बैठकीत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सध्या भारताकडे १५ दिवस पाणी साठवण्याची क्षमता आहे, परंतु नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता ५५ ते ६० दिवसांपर्यंत वाढेल.” ५५-६० दिवस पाणी रोखणे म्हणजे पाकिस्तानमधील शेतीचा गळा आवळण्यासारखे आहे. जेव्हा पाकिस्तानच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असते, त्याच वेळी भारत पाणी रोखू शकतो, अशी भीती तिथल्या तज्ज्ञांना वाटते आहे.

Punjab Rural Sustainable Water Supply and Sanitation Project results (mid-2025): 218,000 people in 180 villages now have safe water – 99% of connected households receive WHO-standard supply. Delivering equitable, reliable services through PRMSC: https://t.co/ftST3PiW5y pic.twitter.com/gmUQuhA0VW — World Bank Group Pakistan (@WBG_Pakistan) March 2, 2026

credit – social media and Twitter

दुष्काळ की पूर? भारताच्या हाती ‘बटण’

पाकिस्तानचा सर्वात मोठा आरोप असा आहे की, भारताकडे आता पाकिस्तानमध्ये ‘दुष्काळ’ किंवा ‘पूर’ निर्माण करण्याची शक्ती आली आहे. जर भारताने मुसळधार पावसाळ्यात साठवलेले पाणी एकदम सोडले, तर पाकिस्तानचा मोठा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. दुसरीकडे, उन्हाळ्यात पाणी रोखल्यास तिथे पिण्याच्या पाण्याचाही हाहाकार माजेल. यालाच पाकिस्तान “भारताचे नवीन युद्धतंत्र” म्हणून संबोधत आहे. पाकिस्तानने आता या संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःचे मोठे तलाव आणि साठवणूक केंद्रे बांधण्याची तयारी सुरू केली आहे, परंतु त्यांच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे हे प्रकल्प पूर्ण करणे कठीण दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel Iran War: हिजबुल्लाहचा ‘राजकीय’ अंत! मोहम्मद राद इस्रायली हवाई हल्ल्यात ठार; IDFने प्रथमच केला ‘Iron beam’ने घातक प्रहार

सिंधू पाणी कराराचे भविष्य धोक्यात

१९६० मध्ये झालेला सिंधू पाणी करार हा जगातील सर्वात यशस्वी करारांपैकी एक मानला जातो, परंतु गेल्या काही वर्षांत दहशतवाद आणि सीमावादावरून भारताने आपली भूमिका कडक केली आहे. “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” या पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर भारताने काश्मीरमधील नद्यांचे पाणी अडवण्याचे धोरण स्वीकारले आहे. भारताचे हे प्रकल्प आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच असले, तरी पाकिस्तान मात्र याला जागतिक मंचावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताच्या ६० अब्ज डॉलर्सच्या या गुंतवणुकीने हे स्पष्ट केले आहे की, आता ‘पाणी’ हेच भारत-पाक संबंधांमधील सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत काश्मीरमध्ये कोणत्या नद्यांवर प्रकल्प बांधत आहे?

    Ans: भारत मुख्यत्वे झेलम आणि चिनाब या दोन पश्चिम नद्यांवर जलसंचय आणि वीज प्रकल्प बांधत आहे.

  • Que: पाकिस्तानला भारताच्या या प्रकल्पांची भीती का वाटते?

    Ans: पाकिस्तानला भीती आहे की भारत ५५-६० दिवस पाणी रोखून तिथे कृत्रिम दुष्काळ आणू शकतो किंवा पावसाळ्यात पाणी सोडून पूर आणू शकतो.

  • Que: सिंधू पाणी करार काय आहे?

    Ans: १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेला हा करार असून, यानुसार नद्यांच्या पाणी वाटपाचे नियम ठरवले गेले आहेत.

Web Title: India pakistan water dispute kashmir dam projects shahbaz sharif tension 60 billion dollars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Indus Water Treaty:
  • jammu kashmir
  • World news

संबंधित बातम्या

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?
1

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
2

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

मिसाईल, ड्रोन आणि क्रूझ… UAE वर तुटून पडला इराण! ५०० हून अधिक शस्त्रांस्त्रांचा अबू धाबीवर वर्षाव; विध्वसंक VIDEO
3

मिसाईल, ड्रोन आणि क्रूझ… UAE वर तुटून पडला इराण! ५०० हून अधिक शस्त्रांस्त्रांचा अबू धाबीवर वर्षाव; विध्वसंक VIDEO

US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले;  दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा
4

US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले; दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.