Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जम्मू-काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे अन् राहणार’; संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताने पाकिस्तानला खडसावले

India-Pakistan Relations: संयुक्त राष्ट्रांची (UN) देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मंगळवारी (25 मार्च) बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2025 | 03:26 PM
India slams Pakistans repeated references on Jammu and Kashmir at United Nations

India slams Pakistans repeated references on Jammu and Kashmir at United Nations

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांची (UN) देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मंगळवारी (25 मार्च) बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताने पाकिस्तानला जोरदार शब्दात फटकारले. भारताने पाकिस्तानला ठाम इशारा देत म्हटले की, बेकायदेशीरपणे कब्जा घेतलेल्या भागातून माघार घ्यावी. गेल्या अनेक वर्षापासून भारत पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीर मुद्द्यावरुन वाद झाला आहे.

पाकिस्तानच्या Pok भूमीकेवर तीव्र शब्दांत टीका

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. हरीश यांनी म्हटले की, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राही. यामुळे पाकिस्तानने सतत या मुद्दयावर बोलणं सोडावे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या मुद्द्यावर अपप्रचार करु नये. यामुळे त्यांच्या दाव्यांना कोणताही अधिकार मिळत नाही. याउलट, त्यांच्या या वागण्यावरुन दहशतवाद्यांना समर्थ आणि भारताविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न दिसून येतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Mehul Choksi: भारताला फसवून ‘या’ देशात लपला आहे फरार मेहूल चोकसी; देशाचे 14 कोटींचे केले नुकसान

Pok तून माघार घ्यावी

भारताने पाकिस्तानला अवैधरित्या ताबा मिळवललेल्या पाक व्याप्त काश्मीर (PoK) तून परत जाण्यास ठामपणे सांगितले आहे. यापूर्वीही जिनिव्हातील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHR) चर्चेदरम्यान भारताने पाकिस्ताने खडे बोल सुनावले होते. या परिषदेतही जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकार उलंलघनाच्या केलेल्या आरोपांवर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

जम्मू-काश्मीरवर भारताची ठाम भूमिका

भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, पाकिस्ताने आपला संकुचित दृष्टीकोन आणि फुटीरवादी अजेंड्यातून बाहेर पडावे. तसेच संयुक्त राष्ट्रांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये. भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश यांनी संयुक्त राष्ट्रांत भाष्य करताना पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेल्या आरोपांचे खंडन केले. त्यांना म्हटले की, वारंवर उल्लेख केल्याने पाकिस्तानचे दावे सिद्ध होत नाहीत. तसेच जम्मू-कश्मीरवर भारताची ऐतिहासिक आणि कायदेशीर मालकी असल्याचेही त्यांना स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय समुदायकडे भारताचे आवाहन

जम्मू आणि कश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तातने दहशतवाद्यांना मदत केल्या अनेक पुराव्यांवरुन स्पष्ट होते की, त्यांनी शांतता आणि स्थैर्य बिघडवण्याचा प्रयत्न केला आहेय यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर दखल घेण्याची मागणी भारताने केली आहे. भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानाला त्यांच्या चुकांची जाणीव करुन देण्यासाठी भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये अराजकता! बलुचिस्तानला पाकपासून वेगळे करण्याची बलुच नागरिकांची मागणी

Web Title: India slams pakistans repeated references on jammu and kashmir at united nations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.