
Indus Water Treaty
मलिक यांनी पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मलिक यांनी पाकिस्तानची जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंहून असल्याचे म्हटले.
सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानच्या उपजिवेकेचा मोठा आधार आहे. यामध्ये कोणीही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मंत्री उताउल्ला तरार यांनीही सिंदू पाणी करार वैध असल्याचा दावा केला.
भारताने करार स्थगित केला असला तरी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेला नाही. यामुळे हा करार एकतर्फी रद्द होत नसून पश्चिमेकडील नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्का असल्याचे तरार यांनी म्हटले.
१९६० मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला होता. या करारानुसार, रावी, बियास, आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्यावर भारताला वापरण्याचा अधिकार आहे. तर सिंधू, चिनाब आणि झेलम नदीच्या पश्चिमेकडील पाण्यावर पाकिस्तानचा हक्का आहे.
एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवल्यावरच हा करार पुन्हा अद्ययावत करण्यात येईल असे भारताने म्हटले आहे. तेव्हापासून पाकिस्तान सतत भारताला धमक्या देत आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव सातत्याने वाढत आहे.
پاکستان کے 50 فیصد لوگوں کے روزگار کا ذریعہ زراعت ہے جو ہمارے پانی پر ہاتھ ڈالے گا وہ ہاتھ کاٹ دینگے۔ ~ وفاقی وزیر ڈاکٹر مصدق ملک کی اہم نیوز کانفرنس pic.twitter.com/vo9nmtBvvm — Senator Musadik Office (@Team_Musadik) June 29, 2026
Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?