Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Water Treaty: ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही!’ सिंधू पाणी करारावरून भारत आक्रमक; पाकिस्तानच्या मात्र घशाला कोरड

Indus Water Treaty Conflict: भारताने सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानला इशारा दिला आहे की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. तसेच चीन-म्यानमार कॉरिडॉर आणि पाकिस्तानी हवाई हल्ल्यांवरही भारताने कठोर भूमिका घेतली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 03, 2026 | 07:07 PM
indus water treaty suspended india pakistan conflict mea randhir jaiswal cross border terrorism chenab river diverted

indus water treaty suspended india pakistan conflict mea randhir jaiswal cross border terrorism chenab river diverted

Follow Us
Follow Us:
  • सिंधू पाणी करार स्थगित
  • चर्चा आणि दहशतवाद एकत्र नाही
  • पाकिस्तानचा थयथयाट आणि भारताचा इशारा

MEA Randhir Jaiswal on Pakistan terrorism : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक तणावाने आता एक अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून दोन्ही देशांमधील पाण्याचे गणित सांभाळणारा ऐतिहासिक ‘सिंधू पाणी करार’ (Indus Waters Treaty) आता धोक्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या कराराला स्थगिती (In Abeyance) दिली आहे. या निर्णयामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांनी आणि लष्कराने भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला अत्यंत सडेतोड आणि कठोर शब्दांत उत्तर देत त्यांची जागा दाखवून दिली आहे.

नवी दिल्लीत आयोजित एका हाय-व्होल्टेज पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे जगासमोर मांडली. जयस्वाल म्हणाले, “सिंधू पाणी कराराबाबत भारताची भूमिका अत्यंत ठाम आणि सुसंगत आहे. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला (Cross-Border Terrorism) मिळणारे त्याचे समर्थन अधिकृतपणे आणि खात्रीशीरपणे पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.” भारताने थेट शब्दांत इशारा दिला आहे की, ‘चर्चा आणि दहशतवाद’ कधीही एकत्र नांदू शकत नाहीत आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bilahari Kausikan: ‘अणुबॉम्ब नसता तर तुमची…’ सिंगापूरच्या माजी राजदूतांनी ‘असे’ म्हणून पाकिस्तानच्या जखमेवर चोळले मीठ

पाकिस्तानी मंत्र्यांची चिथावणी आणि भारताचे प्रत्युत्तर

भारताने सिंधू नदीचे पाणी अडवल्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये पाण्याचे प्रचंड मोठे संकट निर्माण झाले आहे. विशेषतः सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या भीतीपोटी पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक आणि पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी “आमच्या पाण्याला हात लावणाऱ्यांचे हात कापले जातील,” अशी युद्धाची भाषा केली होती. तसेच भारताने पाण्याचे ‘शस्त्रीकरण’ (Weaponization of Water) केल्याचा खोटा आरोप आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला.

पाकिस्तानी मंत्र्यांच्या या थयथयाटावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, “पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही हे स्पष्ट केले आहे की, ज्या निष्पाप भारतीयांचे रक्त सांडले आहे आणि ज्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अद्याप सुकलेले नाहीत, त्या दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांना भारताकडून पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. शत्रू देशाने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.” भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कोंडी झाली आहे.

‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’  भारताची ऐतिहासिक भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही” (Blood and water cannot flow together) अशी घोषणा केली होती. १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या कराराचा पाकिस्तानने नेहमीच गैरफायदा घेतला आहे. भारताने काश्मीरमध्ये बांधलेल्या प्रत्येक जलविद्युत प्रकल्पाच्या (उदा. किशनगंगा, बागलीहार, पाकल दुल) कामात पाकिस्तानने नेहमीच तांत्रिक अडचणी निर्माण करून खोडा घातला आहे. आता भारताने चिनाब नदीचे पाणी बियास नदीकडे वळवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या शेतीचे कंबरडे मोडले आहे.

“Pakistan must credibly, irrevocably abjure support for cross-border terrorism”: MEA says Indus Waters Treaty remains in abeyance Read @ANI Story | https://t.co/vlVEpk4wt2#India #Pakistan #IWT #crossborderterrorism pic.twitter.com/MrPyXPk7Lv — ANI Digital (@ani_digital) July 3, 2026

credit – social media and Twitter

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनीही पाकिस्तानला धारेवर धरले. त्यांनी सांगितले की, जो देश दहशतवादाला सरकारी धोरण म्हणून वापरतो, त्याने ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या कराराच्या आधारे भारताकडून सहकार्याची आणि सद्भावनेची अपेक्षा ठेवू नये. बदललेल्या जागतिक आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार हा करार आता कालबाह्य झाला असून, भारताला आपल्या हक्काच्या पाण्यावर पूर्ण अधिकार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : GlobalTrade : पाकिस्तानची नाकेबंदी फेल! भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीपुढे झुकला ड्रॅगनचा चेला; दुबई बनला नवा व्यापारी गढ

अफगाणिस्तानवरील हल्ल्याचाही भारताकडून तीव्र निषेध

याच पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा आणखी एक बुरखा फाडला. पाकिस्तानने नुकतेच अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून केलेले हवाई हल्ले (Airstrikes) आणि त्यामध्ये निष्पाप महिला व मुलांसह झालेल्या नागरिक मृत्यूचा भारताने तीव्र निषेध केला. रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे पूर्ण समर्थन करतो. पाकिस्तान एकीकडे स्वतःला पीडित दाखवतो आणि दुसरीकडे शेजारील देशांवर भ्याड हल्ले करतो, हे आता जगासमोर आले आहे. भारताने अफगाणिस्तानला आपली मानवतावादी मदत आणि वैद्यकीय पुरवठा सुरूच ठेवला आहे, ज्यामुळे या भागात भारताची विश्वासार्हता अधिक वाढली आहे.

Web Title: Indus water treaty suspended india pakistan conflict mea randhir jaiswal cross border terrorism chenab river diverted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Dubai
  • India-Pakistan Conflict
  • Indus Water Treaty
  • World news

संबंधित बातम्या

GlobalTrade : पाकिस्तानची नाकेबंदी फेल! भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीपुढे झुकला ड्रॅगनचा चेला; दुबई बनला नवा व्यापारी गढ
1

GlobalTrade : पाकिस्तानची नाकेबंदी फेल! भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीपुढे झुकला ड्रॅगनचा चेला; दुबई बनला नवा व्यापारी गढ

Ali Khamenei: हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन… भारताकडून अयातुल्ला खामेनींना आदरांजली; इराणमध्ये 6 दिवसांचा अंत्यविधी सोहळा
2

Ali Khamenei: हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन… भारताकडून अयातुल्ला खामेनींना आदरांजली; इराणमध्ये 6 दिवसांचा अंत्यविधी सोहळा

‘भारत वाईट…’ भारतावर टीका, अमेरिका-चीनचं कौतुक; पेप्सिकोच्या माजी CEO इंदरा नुयी यांचे खळबळजनक विधान
3

‘भारत वाईट…’ भारतावर टीका, अमेरिका-चीनचं कौतुक; पेप्सिकोच्या माजी CEO इंदरा नुयी यांचे खळबळजनक विधान

Rakesh Chauhan Case: शरिरातील अवयव गायब! व्हेनेझुएलातून आलेल्या भारतीय खलाशाच्या मृतदेहाची विटंबना; दूतावासाची चौकशीची मागणी
4

Rakesh Chauhan Case: शरिरातील अवयव गायब! व्हेनेझुएलातून आलेल्या भारतीय खलाशाच्या मृतदेहाची विटंबना; दूतावासाची चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.