Musk-led DOGE's latest move stops $21M for voter turnout in India
वॉशिंग्टन: अमेरिकेने अनेक देशांवरील आर्थिक मदतीत कपात केली आहे. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील यूएस डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) विभागाने भारतातील ‘वोटर टर्नआउट’ वाढविण्यासाठी दिली जाणारी 22 मिलियन डॉलर्स (सुमारे 190 कोटी रुपये) फंडिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. विभाने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याची माहिती दिली.
विभागाने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून सांगितले की, अमेरिकन करदात्यांच्या पैशांचा वापर बाहेरील देशांत होऊ नये, यासाठी ही मदत थांबवण्यात आली आहे. यामुळे भारताला धक्का बसला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
– $486M to the “Consortium for Elections and Political Process Strengthening,” including $22M for “inclusive and participatory political process” in Moldova and $21M for voter turnout in India.
$21M for voter turnout? This definitely is external interference in India’s electoral… https://t.co/DsTJhh9J2J
— Amit Malviya (@amitmalviya) February 15, 2025
भाजपच्या आयटी सेल प्रमुख नाराज
अमेरिकेच्या या निर्णयावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भारताच्या निवडणूक प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाचा हा प्रयत्न आहे, आणि यामुळे सत्ताधारी पक्षाला कोणताच फायदा होणार नाही.” भारताबरोबरच बांगलादेशालाही 29 मिलियन डॉलर्सच्या मदतीत कपात करण्यात आली आहे.
तर अमेरिकेच्या DOGE विभागाने एकूण 723 मिलियन डॉलर्सच्या विदेशी निधीत कपात केली असून याचा उद्देश सरकारी खर्चांवर मोठ्या प्रमाणात आळा घालणे आहे. विभागाने सरकारी खर्च कमी करण्यासाठी मागील काही आठवड्यांपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
मस्क आणि मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे अमेरिकेचा दौरा केला होता. या भेटीत त्यांनी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली. दोघांमध्ये इनोव्हेशन, स्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शाश्वत विकास या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेतील संस्थांमध्ये या क्षेत्रांत अधिक सहकार्य कसे वाढवता येईल, यावरही विचारविनिमय झाला. या भेटीदरम्यान मस्क यांच्या तीन मुलांनीही पंतप्रधान मोदींशी संवाद साधला.
अमेरिकेच्या या आर्थिक निर्णयाचा भारताच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तथापि, भारताच्या स्वायत्त निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा विरोध केला जात आहे.