
नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
पावसाळ्यात कालीगंडकी नदीची पाणीपातळी वाढणे आणि सेती नदीचा प्रवाह बदलल्याने हे पवित्र स्थळ पाण्यात गेले आहे. त्यामुळे भाविकांना येथे पोहोचणे कठीण झाले आहे. नद्यांचे प्रवाह बदलणे आणि नदीपात्राच्या हद्दीत येणाऱ्या भागांमुळे स्थानिक प्रशासनावरही टीका होत आहे. ‘रायझिंग नेपाळ डेली’च्या वृत्तानुसार, आशियातील सर्वांत मोठ्या शालिग्राम शिळेचे संरक्षण करण्यात अपयश आल्याने अधिकाऱ्यांवर टीका होत आहे. भाविकांना आता दूरूनच पूजा-अचर्चा करून परतावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
वजन तब्बल ३१ टन
नेपाळशी संबंधित हा सर्वांत मोठा शालिग्राम प्रत्यक्षात अॅमोनाइटचा एक विशाल नैसर्गिक जीवाश्म आहे. प्राचीन काळात जेव्हा हिमालयाच्या जागी तेथीस महासागर होता तेव्हा भूगर्भीय हालचालींमुळे नंतर तिथे हिमालय पर्वत निर्माण झाला. यामुळे सागरी जीव तिथेच दबले गेल्याचे म्हटले जाते ज्यांचे पुढे दगडात रुपांतर झाले. त्यामुळे शालिग्राम दगडांवर चक्रासारख्या नैसर्गिक आकृत्या दिसल्याचे सांगितले जाते. त्याचे वजन सुमारे ३१ टन असून, तो जगातील सर्वांत मोठा शालिग्राम मानला जातो. मुक्तिनाथ धामाजवळील पवित्र कालीगंडकी नदीच्या परिसरात सापडलेली ही विशाल शिळा सुमारे १७.५ कोटी वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.
Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार
धार्मिक महत्त्व
सेतीबेनी येथे नेपाळी नववर्ष, हरिशयनी एकादशी, हरिबोधिनी एकादशी आणि मकरसंक्रांतीच्या काळात मोठ्या धार्मिक यात्रा आणि मेळावे भरतात. या पवित्र स्थळी वर्षभर दररोज पूजा-अर्चा केली जाते. शालिग्रामला केवळ नेपाळमध्येच नव्हे, तर भारतासह दक्षिण आशियातील इतर देशांतील हिंदू धर्मीयांमध्येही विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथे सातत्याने भाविक दर्शन आणि पूजेसाठी येत असतात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)