Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला पोहोचले; भारत-पाक तणाव कमी करण्यात होणार यशस्वी?

पहलगाम हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर अमेरिकेपासून ते रशियापर्यंतच्या देशांनी भारताला संयम राखण्यास सांगितले आहे. याच दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2025 | 12:28 PM
Pahalgam Terror Attack Iran’s Foreign Minister Arrives in Pakistan Ahead of Key India Visit

Pahalgam Terror Attack Iran’s Foreign Minister Arrives in Pakistan Ahead of Key India Visit

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करत आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणावामुळे प्रादेशिक आणि जागतिक देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर अमेरिकेपासून ते रशियापर्यंतच्या देशांनी भारताला संयम राखण्यास सांगितले आहे. याच दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादला पोहोचले

भारत-पाकमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी अराघाची भारत-पाक दौऱ्यावर आहेत. सोमवारी (05 मे) इस्लामाबादला पोहोचले आहेत. यानंतर मंगळवारी ते नवी दिल्लीला भेट देतील. दरम्यान पाकिस्तानने इराणच्या या ऑफरचे स्वागत केले आहे. परंतु भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने नेहमीच पाकिस्तानसोबतच्या वादाला द्विपक्षीय असल्याचे संबोधले आहे. तसेच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाला, मुख्यत: काश्मीर मुद्द्यावरुन आक्षेप घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: भारताशी तणावादरम्यान पाकिस्तान राजकारणात फूट; इम्रान खानच्या PTI पक्षाने घेतला ‘हा’ निर्णय

Iranian Foreign Minister Abbas Araghchi arrived in Islamabad on an official visit. He was received by Additional Secretary West Asia , Syed Asad Gillani, Iranian Ambassador to Pakistan and other senior officials.
He will hold important meetings with the Pakistani leadership… pic.twitter.com/QdFx8BXR1J
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) May 4, 2025

भारत-पाकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास इराणचे सकारात्मक पाऊल

दरम्यान तज्ज्ञांनी इराणच्या या ऑफरला एक तणाव कमी करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हटले आहे. इराणच्या या ऑफरने तेहरानला शांती दूत म्हणून पाहिले जात आहे. सध्या इराण अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. मात्र तरीही इराणने भारत पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. इराणचे दोन्ही देशांशी असलेले संबंध दृढ आहेत. यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी होतील अशी अशा व्यक्त केली जात आहे.

भारत-पाक युद्धाचा परिणाम इराणवर होणार?

भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरु झाल्यास दोन्ही देशांचा विकास थांबेल. दोन्ही देशांमधील विकासाच्या योजनांवर याचा परिणाम होई. तसेच दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्था आणि व्यापारावर देखील याचा परिणाम होईल. याचा थेट फायदा रशिया, अमेरिका. चीनसारख्या देशांना होईल.

परंतु याचा फटका इराणला देखील बसण्याची शक्तयता आहे. इराणचे बारत आणि पाकिस्तानसोबत मजबूत व्यापार आणि सांस्कृतिक संबंध आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान युद्धात आमने-सामने आल्यास इराणवर देखील परिणा होण्याची शक्यता आहे. यामुळे इराणला दोन्ही मित्र देशांमध्ये युद्धा होऊ नये असे वाटणार.

यामुळे आता हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे की, इराण आपल्या दोन्ही मित्र देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी होतात, की दोन्ही देश युद्धासाठी आमने-सामने येतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: पाणी रोखण्याच्या बदल्यात पाकिस्तान करणार अणुहल्ला? पाक राजदूतांची पुन्हा पोकळ धमकी

Web Title: Pahalgam terror attack irans foreign minister arrives in pakistan ahead of key india visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • iran
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
2

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
3

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
4

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.