
फोटो सौजन्य AI
बांगलादेशातील फाइनेंशियल इंटेलिजेंस यूनिट ने सांगितले कि शेख हसीना यांची देशांतर्गत आणि देशाबाहेरील मिळून ७६० अरब टका संपत्ती जप्त केली आहे . एजन्सी प्रमुख इख्तियार मोहम्मद मामून यांनी सांगितले कि देशाबाहेरील पैसे पुन्हा देशात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत . या वर्षाच्या शेवटा पर्यंत ते यात यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .
पीओके मध्ये आंदोलने ,पाकिस्तानचे गृहयुद्ध ,बिलावल भुट्टो घाबरला
बांगलादेशात विद्यार्थी आणि जमात ए इस्लामी यांच्या हिंसक आंदोलनानंतर , शेख हसीना यांना देशातून पळून भारतात आश्रय घ्यावा लागला . सत्तेतून पायउतार होत असताना त्या जर स्वतःच्या देशात थांबून राहिल्या असत्या तर पंतप्रधान यांच्या निवासस्थानी जेव्हा हिंसक आंदोलक पोहोचले होते . तेव्हाच त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता . तेव्हा स्वतःचा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांचा जीव वाचवत त्या भारतात आल्या . नंतर मोहम्मद युसूफ यांच्या अंतरिम सरकारने इंटरनेशनल क्राइम्स ट्रिब्यूनल मध्ये गुन्हा नोंद करून कारवाई सुरु केली .
तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन
हिंसक आंदोलन झाल्यानंतर बांगलादेशात तारिक रहमान यांचे सरकार आले . त्या सरकारने शेख हसीना यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला . गुन्हा नोंद करताना त्यांनी शेख हसीना यांच्यावर अमानवीय कृत्य , दडपशाही , भ्रष्टाचार या सारखे आरोप केले . आणि शेख हसीना याना मृत्युदंडाची शिका सुनावली . तसेच सरकारने शेख हसीना यांच्या बांगलादेशातील सर्वात जुन्या असलेल्या पक्षावर बंदी घातली गेली . त्यांच्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यास सुरवात केली . आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शेख हसीना यांनी सांगितले कि , मी पुन्हा माझ्या मायदेशी परत जाईन आणि लावलेल्या सर्व निराधार , खोट्या आरोपांना आव्हान देईन . मला माझ्या मायदेशीच मृत्यू आलेला आवडेल .