
Middle east war
El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य
नुकतेच, कतारमधील रास लाफान येथे झालेल्या भीषण स्फोटात १२ कामागारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवाय होर्मुझ सामुद्रधुनीतही सहा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका-इराणच्या व्यापारी जहाजांवरही हल्ल्यांमुळे अनेक भारतीय होर्मुझ समुद्रात अडकनू पडले आहे. सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे परिस्थिती बिकट झाली होती. ज्यामुळे युद्ध थांबले असले तरी भारतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आखाती देशांवर इराण हल्ल्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. सौदी अरेबिया, यूएई, कतार यांसारख्या अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय काम करतात. या हल्ल्यांमुळे मात्र त्यांचे जीवन धोक्यात आले होते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी भारतीय नागरिक असलेल्या जहांजांवरील अमेरिकेच्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या हल्ल्यांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला होता. यामुळे भारत आणि अमेरिकेत काहीसा तणाव निर्माण झाला आहे.
परंतु अस्थिर परिस्थिती पाहता परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक भारतीय परदेशात अडकून पडले असून त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. विदेशी सरकारसोबत संपर्क साधून नागरिकांची सुरक्षितता निश्चित केली जात आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये सध्या ६० दिवसांची युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून यातील पहिली फेरी पार पडली आहे. यामुळे होर्मुझचा मार्ग लवकरच सुरु केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु तणाव कायम आहे. यामुळे युद्ध पुन्हा भडकू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन आखाती देशांना केले आहे. तसेच अमेरिका-इराणकडे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली जात आहे.
होर्मुझ उघडताच शत्रूची धुर्त खेळी; पाकिस्तानच्या ‘या’ निर्णयामुळे भारतावर ओढवणार महाभंयकर संकट