
कार अचानक पाण्यात बंद पडल्यास आपण लगेच घाबरून जातो. आशा वेळेस काय केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याबाबत आपण जाणून घेऊयात. तुमची एक चूक गाडीचे इंजिन खराब करू शकते किंवा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
जेव्हा रस्त्यावर जास्त पातळी असलेल्या पाण्यात आपली गाडी बंद पडते तेव्हा, सायलेन्सर किंवा ‘एअर इनटेक’ पाईपद्वारे पाणी इंजिनच्या आत जाण्याचा धोका असतो.इंजिनच्या सिलिंडरमध्ये हवेऐवजी पाणी गेल्यास नुकसान होऊ शकते. आशा वेळेस तुम्ही गाडीचे इंजिन स्टार्ट केले किंवा जबरदस्तीने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर इंजिनचे नुकसान होऊ शकते.
गाडी पाण्यात बंद पडल्यास काय करू नये
1. इंजिन स्टार्ट करू नये
2. इलेक्ट्रिक सिस्टिम असल्यास बंद करावी.
3 गाडीतून सुरक्षितपणे बाहेर पडावे.
4. मेकॅनिक किंवा टोइंग सर्व्हिसलाफोन करावा.
पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री?
पावसाळ्यात बाईक चालवणे जितके सुखद असू शकते, तितकेच ते आपल्या वाहनासाठी आव्हानात्मक असू शकते. पाण्याने भरलेले रस्ते, चिखल, दमटपणा आणि अचानक येणारा पाऊस बाईकच्या विविध भागांवर अतिरिक्त ताण निर्माण करतात. अशा परिस्थितीत, देखभालीच्या काही महत्त्वाच्या टिप्स वेळेवर पाळल्या नाहीत, तर एका लहानशा निष्काळजीपणामुळेही मोठे बिघाड होऊ शकतात. सुदैवाने, काही सोप्या उपाययोजना करून, तुम्ही तुमची बाईक संपूर्ण पावसाळ्यात चांगल्या स्थितीत ठेवू शकता.
Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन विसरा
सर्वात आधी ब्रेक तपासा
पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमवर सर्वाधिक परिणाम होतो. ओल्या रस्त्यांवर ब्रेक पॅड्स लवकर झिजतात आणि ब्रेक फ्लुइड ओलावा शोषून घेते, ज्यामुळे ब्रेकिंगच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी, तुमच्या ब्रेक पॅड्सची जाडी नक्की तपासा आणि आवश्यक असल्यास ते बदलून घ्या.