
हायवेवरील पार्किंग आता महागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 60 दिवसांत ट्रक आणि अनधिकृत बांधकामे हटवणार (फोटो सौजन्य-Gemini)
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, बेकायदेशीर पार्किंग किंवा सदोष प्रणालीमुळे एक जरी जीव गेला, तरी ते एक गंभीर अपयश आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवर कोणत्याही ट्रक किंवा व्यावसायिक वाहनांना उभे (पार्क) करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
रस्त्यावरील सुरक्षा सुधारण्यासाठी, सरकारने अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट्स) उत्तम प्रकाशयोजना, नियमित ट्रक पार्किंग (ले-बाय) आणि पाळत ठेवणाऱ्या यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.
आता तुमची कार सुद्धा मागेल दारू! पेट्रोल-डिझेल नव्हे चक्क दारूवर चालणार कार? ‘E85’ मास्टरप्लॅन तयार