
रेल्वेत 'सेकंड क्लास प्रवासी' म्हणजे काय? खर्चावरून प्रवाशाचा वर्ग ठरवू नये, सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा
मध्य प्रदेश हायकोर्टाचा निर्णय रद्द
सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे दावा न्यायाधिकरण आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द करून रेल्वेतून पडून मृत्यू पावलेल्या एका प्रवाशाच्या पत्नीला दिलासा दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून मृत व्यक्तीला तिकीट नसलेला प्रवासी मानले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, मृताच्या पत्नीने तिच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे म्हटले होते की, तिच्या पतीकडे वैध रेल्वे तिकीट होते, परंतु अपघातादरम्यान तिकीट असलेली त्यांची बॅग हरवली होती. न्यायालयाने नमूद केले की, मृत व्यक्ती रेल्वेने प्रवास करत होत्या आणि त्यांचा मृत्यू रेल्वेशी संबंधित एका दुर्दैवी घटनेमुळे झाला, याबद्दल कोणताही वाद नाही. याचिकाकर्त्यांच्या पत्नीच्या वतीने लीगल एडच्या वकील श्वेता प्रियदर्शनी हजर होत्या.
असे होते प्रकरण
हे प्रकरण २८ नोव्हेंबर २०१५ चे आहे. मृत चंद्रकांत ठक्कर हे रायपूरहून अहमदाबादला १२८३४ क्रमांकाच्या अहमदाबाद-हावडा मेल ट्रेनने प्रवास करत होते. तेगाव सेक्शनजवळ धावत्या ट्रेनमधून पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने रेल्वे दावा न्यायाधिकरण अधिनियम, १९८७ अंतर्गत ४ लाख रुपये आणि १८ टक्के व्याजाच्या नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली.
Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय
रेल्वेमध्ये अधिक कर्मचाऱ्यांची गरज