
किया इंडियाने सुरू केला ‘बकल अप’ उपक्रमाचा दुसरा टप्पा
नवी दिल्लीमधील ट्रान्सपोर्ट भवन येथे झाले उद्घाटन
किया इंडियाचे प्रमुख अधिकारी व वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित
मुंबई: जबाबदार गतीशीलता प्रमुख म्हणून आपली भूमिका अधिक दृढ करत किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास प्रीमियम कारमेकर कंपनीने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या (एमओआरटीएच) आश्रयांतर्गत द सोशल लॅब फाऊंडेशन (टीएसएल)सोबत सहयोगाने आपला प्रमुख रस्ता सुरक्षा उपक्रम ‘बकल अप’च्या लाँचची (Automobile News) घोषणा केली. या पुढील टप्प्यानिमित्त किया इंडिया आणि टीएसएलने या उपक्रमाची अधिक पोहोच व प्रभावासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. नवी दिल्लीमधील ट्रान्सपोर्ट भवन येथे एमओआरटीएचचे माननीय राज्यमंत्री अजय टम्टा यांच्या हस्ते फेज २ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि किया इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बकल-अप प्रकल्पाच्या फेज १ दरम्यान (फेब्रुवारी २०२४ – फेब्रुवारी २०२६), किया इंडियाने रस्ता सुरक्षेसंदर्भात आव्हानांचे निराकरण करण्यासाठी गुरूग्राम वाहतूक पोलिसांसोबत सहयोग केला, जेथे पायाभूत सुविधा आणि वर्तणूकीसंदर्भात जागरूकता यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गुरुग्राममधील ओळखण्यात आलेल्या अत्यंत धोकादायक भागांमध्ये ७५० क्रॅश बॅरियर्स बसवण्यात आले, ज्यासह प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक पायाभूत सुविधा प्रबळ करण्यात आल्या. या प्रयत्नांना पूरक म्हणून किया इंडियाने १०० शाळांमध्ये संरचित रस्ता सुरक्षा माहिती उपक्रम राबवले, ज्याद्वारे ते जवळपास ३२,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आणि रस्त्यावरील तरूण वापरकर्त्यांमध्ये लवकर जागरूकता निर्माण करण्याला चालना दिली.
Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील
फेज १ अंतर्गत तरुणांचा सहभाग वाढवत आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने काम करत समुदाय-केंद्रित रस्ता सुरक्षेसाठी विकासात्मक व निष्पत्ती-केंद्रित मॉडेल तयार करण्यात आले. या मजबूत पायावर आधारित फेज २ (एप्रिल २०२६ – मार्च २०२८) मध्ये उपक्रमाचा भौगोलिक विस्तार आणि प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले जाणार आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये १०० कॉलेजमधील सुमारे २०,००० विद्यार्थ्यांना प्रगत ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स व संरचित प्रशिक्षण मॉड्यूल्सद्वारे सहभागी करून सुरक्षित ड्रायव्हिंगविषयी जागरूकता निर्माण केली जाईल. तसेच गुरगाव आणि दिल्ली-उत्तराखंड महामार्गासारख्या उच्च-जोखीम भागांमध्ये अतिरिक्त क्रॅश बॅरियर्स बसवून रस्ता सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येतील.
एमओआरटीएचचे राज्यमंत्री अजय टम्टा यांनी पायाभूत सुविधा व जागरूकता उपक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा बळकट करण्यासाठी किया इंडियाच्या संरचित दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि अपघात कमी करण्यासाठी उद्योग-सरकार सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.किया इंडियाचे प्रतिनिधी सूद यांनी सांगितले की, ‘बकल अप’ उपक्रमाद्वारे सुरक्षित गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्याची कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ होत आहे आणि फेज २ मध्ये तरुण व पहिल्यांदा वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल.
टीएसएल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक अपूर्व शर्मा यांनी नमूद केले की, फेज १ मध्ये तयार झालेल्या ऑपरेशनल पायावर आधारित फेज २ मध्ये या उपक्रमाचा विस्तार नवीन भौगोलिक क्षेत्रे व विविध वयोगटांपर्यंत केला जाईल. या उपक्रमाद्वारे किया इंडिया सरकार, स्थानिक प्राधिकरणे आणि समुदाय भागधारकांसोबत सहयोगाने काम करत देशभरात सुरक्षित रस्ता वर्तणूक आणि मजबूत गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्यास हातभार लावत आहे.