
2800 तरुणांना मिळणार रोजगार! टोयोटा किर्लोस्करचा मोठा विस्तार; बिडकीन प्लांटमध्ये दरवर्षी तयार होणार १ लाख वाहने
टोयोटा किर्लोस्कर मोटरने महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नवीन वाहन विनिर्माण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. २०२९ पर्यंत उत्पादन सुरू करण्याचे नियोजन असलेल्या या प्रकल्पात दरवर्षी १ लाख वाहने तयार करण्याची क्षमता असेल. स्टॅम्पिंग, वेल्डिंग, पेंटिंग आणि असेंब्लीसह अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया येथे राबवल्या जाणार असून, प्रामुख्याने नवीन SUV मॉडेलचे उत्पादन केले जाईल. या प्रकल्पामुळे सुमारे २,८०० रोजगारनिर्मिती होणार असून, भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टोयोटाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नवीन वाहन विनिर्माण प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली आहे. या नवीन प्रकल्पातील उत्पादन २०२९ च्या उत्तरार्धात सुरू होण्याचे नियोजित असून, याद्वारे भारतीय बाजारपेठेतील टोयोटाच्या व्यवसायाचा पाया अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा नवीन प्रकल्प केवळ भारतातील ग्राहकांसाठीच नव्हे, तर आसपासच्या प्रदेशातील ग्राहकांनाही सातत्याने वाहने पुरवण्यासाठी सज्ज असेल.
Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या
महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात येणारा हा नवीन प्रकल्प टोयोटाच्या उत्पादन क्षमतेत मोठी भर घालणारा ठरेल. या प्रकल्पाचे नियोजन २०२९ च्या पहिल्या सहामाहीत उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने करण्यात आले असून, येथे दरवर्षी १,००,००० वाहने तयार करण्याची क्षमता असेल. या प्रकल्पामुळे सुमारे २,८०० व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या कारखान्यात स्टॅम्पिंग, वेल्डिंग, पेंटिंग आणि असेंब्ली यांसारख्या प्रमुख उत्पादन प्रक्रिया पार पाडल्या जातील. विशेष म्हणजे, या प्रकल्पात प्रामुख्याने एका नवीन एसयूव्ही मॉडेलचे उत्पादन केले जाणार आहे, जे भारतीय बाजारपेठेसह जागतिक गरजा पूर्ण करेल.
भारतातील टोयोटाचा व्यवसाय या बाजारपेठेतील अग्रदूत आणि अनुभवी व्यक्तींच्या साथीने विकसित झाला आहे. टोयोटाला या प्रवासात त्यांच्याकडून अमूल्य मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, टोयोटा आपली उत्पादन संरचना अधिक सक्षम करणे सुरू ठेवेल. जेणेकरून भारत आणि आसपासच्या प्रदेशातील मागणीतील वाढ आणि बाजारपेठेतील बदलांना लवचिकपणे प्रतिसाद देता येईल आणि ग्राहकांच्या पसंतीची उत्पादने वेळेत उपलब्ध करून देता येतील. या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून आणि विविध भागधारक तसेच स्थानिक समुदायांच्या निरंतर सहकार्याने, टोयोटा भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योग आणि समाजाच्या विकासामध्ये आपले योगदान कायम राखेल.