
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Millionaires Migration: पैसा असेल तर माणूस काहीही करु शकतो. असं प्रत्येकवेळी आपल्याला सांगितलं जातं. पण ते खरंच आहे! बघाना नव्या रिपोर्टनुसार ही बातमीच तशी आहे. जगभरात असे अनेक श्रीमंत लोक आहेत जे स्वतःचाच देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करत आहेत. पण का? फक्त पैसा आणि आलिशान जीवन हीच कारणं आहेत का? की आणखी काही महत्त्वाचे बदल यांस कारणीभूत ठरताहेत. सविस्तर जाणून घेऊयात.
फक्त पैसा आणि आलिशान जीवन ही तर कारणं आहेतच. पण आता चांगल्या सुविधा आणि उज्ज्वल भविष्याच्या शोधात आपले देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. कोट्यवधी आणि अब्जावधींची मालमत्ता असलेले अनेक लक्षाधीश आता दुसऱ्या देशांमध्ये आपले नवीन घर वसवताहेत.
हेनलेच्या २०२६ च्या अंदाजानुसार, अंदाजे १.६५ लाख लक्षाधीश, संपत्ती, प्रतिष्ठा आणि आलिशान जीवन असूनही, या वर्षी आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होणार आहेत. श्रीमंतांचे आपले देश सोडून जाण्याचा हा कल जगभरात वेगाने दिसून येत आहे.
अलीकडच्या वर्षांत इतर देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या लक्षाधीशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार…
२०२६: या वर्षी १.६५ कोटी श्रीमंत व्यक्ती आपले देश सोडून जाण्याचा अंदाज आहे.
२०२५: गेल्या वर्षी १.४२ कोटी लक्षाधीशांनी आपले देश सोडले.
२०२४: २०२४ मध्ये १.३४ कोटी लक्षाधीशांनी आपले देश सोडले.
२०१३: २०१३ च्या तुलनेत ही संख्या केवळ ५१,००० च्या आसपास होती.
याचा अर्थ आज स्थलांतर करणाऱ्या श्रीमंत व्यक्तींची संख्या तिप्पटीहून अधिक वाढत चालली आहे.
असे वृत्त आहे की, संयुक्त अरब अमिरात UAE हे जगभरातील श्रीमंत व्यक्तींसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे. तेथील उत्कृष्ट जीवनशैली आणि व्यावसायिक वातावरण हे श्रीमंतांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. UAE चा संपत्ती गतिशीलतेचा म्हणजेच wealth mobility चा स्कोअर ८५.३ असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे ते सर्वाधिक पसंतीच्या देशांपैकी एक बनले आहे. अमेरिकेचा स्कोअर ६२.३ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेपेक्षा जास्त लोक दुसरे नागरिकत्व आणि नवीन ठिकाणांच्या शोधात आहेत.
श्रीमंत व्यक्तींच्या देश सोडून जाण्याच्या या प्रवृत्तीचा आता जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर परिणाम होत आहे. अमेरिका आणि युकेसारखे देश सोडून जाणाऱ्या श्रीमंत व्यक्तींची संख्याही वाढत आहे. सध्या युके हे श्रीमंत व्यक्तींसाठी जगातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. तथापि, युके सोडून जाणाऱ्यांपैकी लक्षणीय संख्येने लोक स्वतः ब्रिटिश नागरिक आहेत.
या अहवालानुसार, भारताबाबतही अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. भारताचा संपत्ती गतिशीलतेचा गुणांक ५६.५ असल्याचे म्हटले जाते. मर्यादित भांडवली नियंत्रण आणि कठोर कर नियम ही भारतीय श्रीमंतांच्या इतर देशांमध्ये होणाऱ्या स्थलांतरामागील प्रमुख कारणांपैकी आहेत.