
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वेदांता ग्रुपचे चेअरमन आणि अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल हा ब्राँड काही सहज बनला नाही. त्याच्या मागे बरीच मोठी गोष्ट आहे. खडतर प्रवास आणि अत्यंत गरिबीतून सुरु झालेली ही वाट अथक प्रयत्नानंतर श्रीमंतीच्या वाटेवर पोहोचली. ही वाटचाल सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक आहे. त्यांनी आपला प्रवास अक्षरशः शून्य भांडवलातून सुरू केला होता. पण आपल्या पहिल्या मोठ्या अधिग्रहणासाठी कर्ज आणि उधारीतून त्यांनी ₹१.६ दशलक्ष उभे केले आणि इथून सुरु झाला प्रवास पुढे ब्राँड बनण्याचा.
या सगळ्या प्रवासाबद्दल सांगताना अनिल अग्रवाल यांनी एक विशिष्ट म्हणीचा वापर केला. ‘वीर भोग्य वसुंधरा’ ही संस्कृत म्हण खूप काही सांगून जाते. याचा अर्थ असा आहे की, जे धाडसी आहेत, जोखीम पत्करतात आणि ते आपल्या क्षेत्रात चिकाटीने काम करतात, तेच भविष्यात यश मिळवतात. या ती शब्दाच्या म्हणीमध्ये आयुष्यात पाहिलेला सगळा प्रवास आणि नवीन उद्योग जगतात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी संदेश ठरतो. त्यांच्या मते, व्यवसायात केवळ आयडिया पुरेशी नसते. तर ती आयडिया सत्यात उतरवण्यासाठी अंगी धाडस आणि कठीण काळात चिकाटीने काम करण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.
अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि, सर, आप जीवन में बड़े-बड़े रिस्क लेते आए हैं, क्या आपको कभी डर नहीं लगा? सच कहूँ तो शुरुआती दिनों में कई बार मुझमें भी यह भावना आई कि अगर मैं वो नहीं कर पाया जो मैं चाहता हूँ, तो क्या होगा? पर तभी याद आ जाती थी बाऊजी से सुनी एक संस्कृत की कहावत – वीर… pic.twitter.com/Y8BA9yGv46 — Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) August 25, 2026
अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या एका जुन्या व्यावसायिक अनुभवाची आठवण सांगितली. त्यांनी त्यांना सुरुवातीला आलेल्या अपयशाचा प्रकर्षाने उल्लेख केला. ज्यात त्यांचा एक सौदा यशस्वी झाला होता. वरवर पाहता, हे नुकसान किंवा अपयश वाटू शकले असते, पण त्यांनी तेवढ्यावरच समाधान मानले नाही. या अनुभवातून त्यांनी बोध घेतला ते शिकले आणि पुढच्या वेळी संधी कशी साधावी, कोणती तयारी करावी आणि अधिक चांगल्या रणनीतीवर काम करत पुढचा टप्पा गाठावा याचं प्लानिंग केलं. या शिकवणीमुळे ते त्यांच्या पुढच्या सौद्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार झाले.
आपल्या यशाबद्दल बोलताना अनिल अग्रवाल यांनी महिलांचादेखील महत्त्वपूर्ण उल्लेख केला. त्यांनी लिहिले, “जेव्हा जेव्हा मी मेहनती तरुण, उद्योजक आणि महिलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवताना पाहतो, तेव्हा त्यांच्यावरील माझा विश्वास अधिकच दृढ होत जातो.”
एके काळी ८x९ फूटच्या खोलीतून सुरु झालेला हा व्यवसाय जागतिक स्तरावर पोहोचला. वेदांता ग्रुपला एका जागतिक नैसर्गिक संसाधन समूहात रूपांतरित केले आहे. वेदांताचा व्यवसाय धातू, खाणकाम, तेल आणि वायू, ऊर्जा आणि इतर नैसर्गिक संसाधने यांसारख्या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या वेदांता ग्रुपच्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल सध्या सुमारे ₹३.६० लाख कोटी (रु. ३,६०,००० कोटी) आहे.