
Startup India 10 Years: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असताना भारतातील स्टार्टअप परिसंस्थेने मोठी झेप घेतली आहे. जानेवारी २०२६ अखेर देशात २ लाख १२ हजारांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स कार्यरत असून, राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राने ३३ हजार ८७२ स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, हेल्थटेक, शिक्षण, कृषी, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील स्टार्टअप्स उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये २० हजार २८७, उत्तर प्रदेशमध्ये १९ हजार ६८१. दिल्लीमध्ये १९ हजार ३७४ आणि तामिळनाडूमध्ये १७ हजार १७९ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. त्यापाठोपाठ हरियाणा, गुजरात, तेलंगणा, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो. या आकडेवारीवरून देशातील उद्योजकतेचा वेग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही राज्यातील सक्षम औद्योगिक पायाभूत सुविधा, कुषाल मनुष्यबळ आणि नवकल्पनांना मिळणाऱ्या पाठबळाची पावती आहे, विशेषतः मुंबई आणि पुणे ही शहरे उद्योग, संशोधन संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योजक यांना जोडणारे मजबूत केंद्र म्हणून विकसित होत आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्टार्टअप्स उभे करण्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि शासन यांच्यातील समन्वय आणखी बळकट करणे गरजेचे आहे.
गेल्या दशकात भारताने जगातील सर्वात मोतवा स्टार्टअप परिसंस्थांमध्ये स्थान मिळवले असून, तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वाढीत महाराष्ट्राची भूमिका सर्वाधिक महत्वाची ठरत आहे, तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमता, सेमीकंडक्टर, हरित तंत्रज्ञान, ड्रोन, इलेवट्रिक वाहन आणि आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या आणि गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
परिसंस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बायोटेक, एडटेक, फिनटेक आणि डीप-टेक क्षेत्रातील शेकडो स्टार्टअप्स पुण्यात कार्यरत आहेत. आयटी पार्क, संशोधन संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, स्टार्टअप इन्क्युबेशन आणि गुंतवणूकदारांचे जाळे यामुळे नवउद्योजकांसाठी पुणे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे ही शहरे स्टार्टअप्सची प्रमुख केंद्रे बनली आहेत. पुण्यात माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमता, सॉफ्टवेअर, डीप-टेक, एडटेक आणि बायोटेक क्षेत्रातील अनेक नवउद्योग वेगाने विकसित होत आहेत. उच्च शिक्षण संस्था, संशोधन केंद्रे, गुंतवणूकदारांची उपलब्धता आणि उद्योगस्नेही वातावरण यामुळे राज्यातील स्टार्टअप परिसंस्था अधिक मजबूत होत आहे.