
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ही घटना पाचपद्राजवळील नेवाई गावात घडली. शेतकरी असलेल्या मंगिलाल मेघवाल यांचे ५ लाख रुपये वाळवीने खाऊन टाकले. मंगिलाल यांची चूक ही होती की, त्यांनी बँकेत पैसे ठेवण्याऐवजी ते एका पेटीत लपवून स्वतःजवळ ठेवले होते. मंगिलाल यांना वर्षभरापूर्वी जमिनीचा एक तुकडा विकून ५ लाख रुपये मिळवले होते. चोरीच्या भीतीने आणि आपली मुले ते पैसे उधळतील या काळजीपोटी, त्यांनी ते पैसे घरी ठेवण्याऐवजी शेतात लपवण्याचा निर्णय घेतला आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.
मंगिलालने ते पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि आपल्या शेतातील एका खड्ड्यात लपवून ठेवले. त्याने ते कुठे लपवले आहे हे आपल्या पत्नीला किंवा मुलांना सांगितलं नाही. काही महिन्यांनंतर, जेव्हा त्याला त्या पैशांची गरज भासली तेव्हा त्याने ते पैसे काढायचा निर्णय घेतला. पण, त्याने ते पैसे नेमके कुठे पुरले होते, ती जागा त्याला आठवत नव्हती. आपल्या १० बिघांच्या शेतात सर्वत्र शोधूनही त्याला ते पैसे सापडले नाहीत.
शेवटी त्याने आपल्या कुटुंबाला लपवलेल्या पैशांबद्दलचे सत्य सांगितले. सुरुवातीला घरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण खूप शोधाशोध केल्यानंतर ते पैसे सापडले. जवळपास वर्षभरानंतर, पावसाळ्यात, शेतात रोकड असलेली एक खराब झालेली पिशवी सापडली. जेव्हा कुटुंबाने ती उघडली, तेव्हा त्यांना आढळले की नोटांच्या बंडलाला वाळवी लागली होती. बहुतेक ५०० रुपयांच्या नोटा खूप खराब झाल्या होत्या आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले होते.
कुटुंबातील सदस्यांनी खराब झालेल्या नोटा गोळा केल्या आणि आपले काही पैसे तरी परत मिळतील या आशेने ते पाचपद्रा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, नोटांची अवस्था इतकी वाईट होती की बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या बदलून देण्यास नकार दिला. कुटुंबातील सदस्य एसबीआयच्या मुख्य शाखेतही गेले, पण तिथेही नोटा बदलून मिळाल्या नाहीत.
RBI च्या नोट परतावा नियमांनुसार, वाळवी लागलेल्या किंवा फाटलेल्या नोटा बदलून मिळू शकतात. मात्र, अनुक्रमांक, गांधीजींचे चित्र आणि गव्हर्नरची सही यांसारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये शाबूत आणि ओळखण्यायोग्य असतील, तर बँक त्या बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.