
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
HDFC Bank: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त CEC आणि माजी अर्थ सचिव, राजीव कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांना अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे आता HDFC Bank ला प्रतिक्षित असलेल्या पदी नियुक्ती झाली आहे.
नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?
संचालक मंडळाने त्यांची ३० जून २०२६ पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. हा निर्णय शेअर्स होल्डर्सच्या मंजुरीच्या अधीन आहे. याव्यतिरिक्त, त्यांची पुढील तीन वर्षांसाठी अर्धवेळ अध्यक्ष म्हणूनही निवड झाली आहे. पण याला अद्याप भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
१९८४ च्या बॅचचे माजी IAS अधिकारी असलेले राजीव कुमार यांनी भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. त्यांनी २०१७ ते २०२० या काळात देशाचे अर्थ सचिव म्हणून काम पाहिलंय. त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मंडळावरही काम केलं आहे.
भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, त्यांना केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुका घेण्याचा अनुभव आहे. इतकंच नाही तर जगातील सर्वात मोठ्या सार्वत्रिक निवडणुकीचे पर्यवेक्षण करण्याचा जागतिक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. याशिवाय, त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवलाची पुनर्रचना यासह अनेक महत्त्वाचे निर्णय अंमलात आणल्याची नोंद त्यांच्या नावे आहे. ते बँकेचे माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांची जागा घेतील.
या वर्षी मार्चमध्ये माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनामा दिला आणि त्यामुळे बँकेतील नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. पण राजीव कुमार यांच्या नियुक्तीमुळे बँकेतील कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबतची चिंता दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी मूल्ये आणि नीतिमत्ता हे कारण देत १८ मार्च २०२६ रोजी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले की, बँकेतील काही घटना किंवा कार्यपद्धती त्यांच्या नैतिक मूल्यांशी आणि तत्त्वांशी विसंगत होत्या. या सगळ्या परिस्थितीमुळे गोंधळ देखील माजला होता. पण आता अध्यक्ष पदावर झालेल्या नियुक्तीमुळे पुन्हा सगळं स्थिरस्थावर होईल हीच अपेक्षा आहे.