भारत आणि युनायटेड किंग्डममध्ये पार पडला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, भारताला काय होईल फायदा? जाणून घ्या (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
India-UK FTA Marathi News: माननीय पंतप्रधान यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधीमंडळात भारतीय उद्योगातील 16 मुख्य व्यावसायिक नेते सामील होते आणि याचे नेतृत्व श्री. सुनील भारती मित्तल, संस्थापक आणि अध्यक्ष, भारती एंटरप्रायझेस तसेच सह-अध्यक्ष, इंडिया-यूके सी.ई.ओ फोरम, यांनी केले. व्यापार प्रतिनिधिमंडळाची व्यवस्था भारतीय उद्योग राष्ट्रमंडळाने (सी.आय.आय ने) केली होती आणि त्याची उपस्थिती भारत–यूके आर्थिक संबंधांचा विकास करण्यासाठी सरकार व उद्योग यांच्यातील मजबूत सहयोग दर्शवते.
या प्रसंगी बोलताना श्री. मित्तल म्हणाले, “मोठ्या आशावादाने सर्व क्षेत्रांमधील भारतीय उद्योग भारत-यूके एफ.टी.ए चे स्वागत करत आहे. नवोपक्रमाला चालना देणारी, बाजारात प्रवेश सुलभ करणारी आणि गुंतवणूक वाढविणारी एक आधुनिक, प्रगत विचारसरणी असलेली भागीदारी या करारातून स्थापित केली जात आहे. द्विपक्षीय सहकार्याचे प्रमाण वाढवण्यासाठी महत्त्वाच्या विकास क्षेत्रांमध्ये पाया घातला जात असल्याने भारत तसेच यूके मधील व्यवसायांना मोठा लाभ होऊ शकतो.”
सी.आय.आय च्या प्रतिनिधी मंडळाचा आणि यूके च्या निवडक सी.ई.ओ सह ब्रिटिश सरकारच्या वरिष्ठ सदस्यांशी आणि धोरणकर्त्यांशी संवाद झाला. चर्चेत सहयोगाच्या प्रमुख क्षेत्रांवर भर देण्यात आला आणि कौशल्ये व हालचालक्षमता, डिजिटल परिवर्तन आणि प्रगत तंत्रज्ञान, शाश्वतता आणि हवामान कृती, आणि औषधनिर्माण व आरोग्य सेवा त्यात सामील होते.
गेल्या पाच वर्षांत भारताने प्रमुख व्यापारी भागीदार असलेल्या यूके सोबत सकारात्मक व्यापार समतोल राखला आहे. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून $120 बिलियन पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही अर्थव्यवस्थांनी ठेवलेले आहे. सध्या यूके मध्ये 970 हून अधिक भारतीय कंपन्या कार्यरत आहेत, निगम कर (कॉर्पोरेशन टॅक्स) मध्ये अंदाजे £1.17 बिलियनचे योगदान देत आहेत आणि सुमारे 1.1 मिलियन लोकांना रोजगार प्रदान करत आहेत, महत्त्वपूर्ण कार्य करून स्थानिक अर्थव्यवस्था आणि उपजीविकेस आधार देत आहेत.
अशी अपेक्षा केली जात आहे की भारत-यूके एफ.टी.ए लागू झाल्यानंतर व्यापारातील अडथळे कमी होतील, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि संयुक्त उपक्रम व तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळेल आणि हे इतरांबरोबर खास करून वस्त्रोद्योग व पोशाख, चामडे आणि चामड्याची उत्पादने, रत्ने आणि आभूषणे, समुद्री उत्पादने यांसारख्या मनुष्यबळ जास्त लागणाऱ्या क्षेत्रांमध्ये दिसून येणार आहे. या करारामुळे एक मजबूत आधारभूत संरचना मिळेल जेणेकरून स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, जीवन विज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील नवीन संधी उघडता येतील. यूके चे नवोपक्रम, वित्त आणि उच्चतम सेवांमध्ये असलेले सामर्थ्य आणि भारताची जलद वाढणारी बाजारपेठ व उत्पादक क्षमता यांची सांगड घातल्याने द्विपक्षीय आर्थिक संबंधांना आणखी वेग प्रदान करता येईल.
पारस्परिक सामाजिक सुरक्षा करार हा एफ.टी.ए चा आणखी एक प्रमुख फायदा असून त्यामुळे यूके मध्ये असलेल्या भारतीय व्यावसायिकांना तीन वर्षांपर्यंत मायदेशी योगदान पाठविता येईल. हे सी.आय.आय ने आधी पाच वर्षांच्या सवलत कालावधीची शिफारस केल्याशी अनुरूप आहे.
यापूर्वी 2024 मध्ये दोन्ही देशांनी एक नवीन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम (टी.एस.आय) सुरू केला आणि राष्ट्रीय सुरक्षा व आर्थिक विकासात तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व ओळखले. टी.एस.आय प्राधान्य क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात द्विपक्षीय सहकार्य वाढवित आहे आणि एफ.टी.ए अशा भागीदारीला आणखी भक्कम करत आहे.
श्री. चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सी.आय.आय म्हणाले की, “सी.आय.आय अनेक काळापासून सर्वसमावेशक आणि दूरदर्शी भारत-यूके मुक्त व्यापार कराराचे समर्थन करत आहे. हा एफ.टी.ए आमच्या द्विपक्षीय संबंधातील एक निर्णायक क्षण दर्शवित असून त्यायोगे सर्वसमावेशक विकास, आर्थिक लवचिकता व औद्योगिक परिवर्तनासाठी सामायिक बांधिलकी दर्शवित आहे. यामुळे भारत आणि यूके च्या व्यवसायांमध्ये सखोल बाजारपेठ प्रवेश, नियामक सहकार्य आणि पुढच्या पिढीतील भागीदारीसाठी मजबूत पाया तयार केला जात आहे.”
India-UK FTA: आता गोव्याची फेनी, नाशिकची वाइन आणि केरळची ताडी लंडनमध्ये उपलब्ध होणार; जाणून घ्या






