
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हा अहवाल भारताच्या डिजिटल कॉमर्स प्रवासात ‘भारत’च्या (ग्रामीण व निमशहरी भाग) वाढत्या महत्त्वावर विशेष भर देतो. सध्या ४८.८ कोटी ग्रामीण इंटरनेट वापरकर्ते असून, ते भारताच्या एकूण सक्रिय इंटरनेट लोकसंख्येच्या ५५% आहेत. तसेच ९८% इंटरनेट वापरकर्ते प्रादेशिक भाषांमध्ये सामग्री वापरतात आणि इंग्रजीच्या तुलनेत प्रादेशिक भाषांमधील व्हॉईस सर्चमध्ये १५६% वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवसायांना अधिक सर्वसमावेशक आणि ‘व्हर्नाक्युलर-फर्स्ट’ (स्थानिक भाषांना प्राधान्य देणारे) ई-कॉमर्स अनुभव तयार करावे लागतील. अहवालात असेही नमूद केले आहे की, टियर-२ आणि टियर-३ शहरांचा भारतातील ऑनलाइन खरेदीदारांमध्ये आधीच ६०% हून अधिक वाटा आहे, जो भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत ‘भारत’चे वाढते योगदान दर्शवतो.
या अहवालात भारतीय ई-कॉमर्सच्या भविष्याला नवा आकार देणाऱ्या तीन प्रमुख ट्रेंड्सविषयी सांगण्यात आले आहे. यानुसार, प्रगत एआय मॉडेल्स आणि जनरेटिव्ह एआय हे बुद्धिमत्तापूर्ण सूचना, संवादात्मक व्यापार आणि व्हिज्युअल डिस्कव्हरीच्या माध्यमातून ग्राहकांना एआय-पावर्ड पर्सनलायझेशनसह सुलभ खरेदीचा अनुभव प्रदान करत आहेत. तसेच, कन्व्हर्जन इंटेलिजन्सच्या माध्यमातून एआय-आधारित सूचना, भविष्यातील निर्णयांचा अंदाज आणि प्रभावी ग्राहक सहभागामुळे ब्रँड्सना कन्व्हर्जन दर, ग्राहक टिकवून ठेवणे आणि सरासरी ऑर्डर मूल्य वाढवण्यास मदत होत आहे. याशिवाय, इंटरनेटचा विस्तार, वाढती ग्रामीण कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक भाषांमधील सामग्रीच्या वापरामुळे भारत-लेंड डिजिटल अडॉप्शनला गती मिळत असून, संपूर्ण देशात डिजिटल कॉमर्सच्या संभाव्य बाजारपेठेचा विस्तार होत आहे.
अहवालानुसार, ९०% भारतीय ग्राहकांचे असे मानणे आहे की जनरेटिव्ह एआयमुळे त्यांचा ऑनलाइन खरेदीचा अनुभव अधिक चांगला झाला आहे, जे एआय-संचालित ई-कॉमर्स अनुभवांची वाढती स्वीकारार्हता दर्शवते. तसेच, एआय-तंत्रज्ञानामुळे संपूर्ण कॉमर्स व्हॅल्यू चेनमध्ये व्यावसायिक निकालांमध्ये कशी सुधारणा होत आहे, याची उदाहरणेही यात देण्यात आली आहेत. आधी खरेदी केलेल्या ग्राहकांचा पुनरागमन कन्व्हर्जन दर नवीन वापरकर्त्यांच्या तुलनेत २.१ पट जास्त असतो. तसेच, २५% पेक्षा जास्त पुन्हा खरेदी करण्याचे प्रमाण असलेल्या ब्रँड्सचा नफा, १५% पेक्षा कमी दर असलेल्या ब्रँड्सपेक्षा ३.४ पट जास्त असतो. हे आकडे ग्राहकांचे एंगेजमेंट, कन्व्हर्जन आणि दीर्घकालीन व्यावसायिक निकाल सुधारण्यात एआयची वाढती भूमिका स्पष्ट करतात.
या निष्कर्षांवर बोलताना, शिपरॉकेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल गोयल म्हणाले, “भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे आणि या प्रवासाला आकार देण्यात तंत्रज्ञान मध्यवर्ती भूमिका बजावेल. आजचे ग्राहक जलद, अधिक वैयक्तिकृत आणि सोयीस्कर खरेदी अनुभवाची अपेक्षा करतात. व्यवसायांच्या दृष्टीने, एआयमध्ये गुंतवणूक करणे, वितरण क्षमता मजबूत करणे आणि मेट्रो शहरांसह नव्याने उदयास येणाऱ्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे अनुभव तयार करणे आवश्यक आहे. हा अहवाल अशा प्रवृत्तींची रूपरेषा मांडतो ज्या येत्या काळात या क्षेत्राची दिशा ठरवतील.”
डेलॉईट इंडियाचे पार्टनर आणि कन्झ्युमर इंडस्ट्री लीडर डॉ. आनंद रामनाथन म्हणाले, “भारत जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात गतिमान कॉमर्स बाजारपेठांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा वेळी केवळ एआयचा स्वीकार करणारे नव्हे, तर त्याचा अचूकता, वेग आणि शिस्तीने कसा वापर करायचा हे शिकणारे ब्रँड्सच विजयी ठरतील. ही संधी खूप मोठी आहे आणि पुढील टप्पा हा दृढनिश्चयाने पावले उचलणाऱ्यांचा असेल.”
हा अहवाल उद्योग संशोधन, बाजारपेठेतील ट्रेंड्स आणि शिपरॉकेटच्या ई-कॉमर्स अभ्यासाचे एकत्रीकरण करून, एआय तंत्रज्ञान भारतातील प्रॉडक्ट शोध, ग्राहक सहभाग, वितरण आणि खरेदी अनुभवांना कसा नवा आकार देत आहे याचे विश्लेषण करतो. तसेच, देशाच्या ई-कॉमर्स परिसंस्थेचे भविष्य घडवण्यात ‘भारत’, प्रादेशिक कॉमर्स आणि एआय-सक्षम वैयक्तीकरण यांच्या वाढत्या महत्त्वाचाही शोध घेतो.