
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nitin Gadkari Presents Technology : जागतिक स्तरावर अंदाधुंदी माजली असताना महागाईचा भडका उडाला आहे. त्यात सगळ्यात मोठा प्रश्न इंधन आणि वायूचा उभा राहत आहे. या गोष्टींचा पुरवठा होत नसल्यामुळे याच्या किमती बऱ्याच भडकल्या आहेत. सध्या देशात LPG गॅसचं संकट आहे. देशाच्या काही भागात घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडून स्थिती सामान्य असल्याचं सांगितलं जात असलं तरीही मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासला होता.
Tata Motors आणि HPCL मध्ये ऐतिहासिक करार; ऑटोमोटिव्ह कचऱ्यापासून बनवणार उच्च दर्जाचे रिफाइंड ऑईल
त्यात सध्याची परिस्थिती स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बाधित झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. भारतात जवळपास 85 टक्के घरगुती वापराचा गॅस आयात केला जातो. या दरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल-आधारित स्टोव टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी ही नवीन टेक्नोलॉजी सादर केली. नेमकी काय आहे ही टेक्नॉलॉजी जाणून घेऊयात.
नितीन गडकरी यांनी ही महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणली आहे. ही टेक्नॉलॉजी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या स्टोववर जेवण बनवणं सोपं होणार आहे. सोबतच हा स्टोवर पर्यावरण अनुकूल आहे असा दावा नितीन गडकरी यांनी केला. हा स्टोव भारताच्या वाढत्या बायोफ्यूल मिशनमध्ये महत्त्वाचा भाग मानला जात आहे. ही स्टोव टेक्नोलॉजी पूर्णपणे स्वदेशी आहे.
स्टोवच वैशिष्ट्य म्हणजे हा स्टोवर पूर्णपणे इथेनॉलवर चालत नाही, इथेनॉलमध्ये पाणी मिसळल्यानंतर हा स्टोव काम करतो. या दोघांच्या मिश्रणातून एक स्वच्छ ऊर्जा निर्माण होते. ही टेक्नोलॉजी पारंपारिक LPG सिलेंडर्स आणि केरोसिनच्या तुलनेत सुरक्षित, कमी खर्चिक आणि प्रदूषण मुक्तीचा पर्याय देणारी आहे.
मागच्या दशकभरात भारतात इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामने उत्तम रिझल्ट दिले आहेत. वर्ष 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण अवघं 1.5 टक्के होतं. सरकारी धोरणं आणि बायोफ्यूल क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने वर्ष 2025 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत सरकारचा फोकस वाहनात इथेनॉल वापरावर होता. पण आता कुकिंग फ्यूल म्हणून वापर करण्याचा प्लान बनवला जात आहे.
गडकरी यांच्यानुसार ही टेक्नोलॉजी LPG सिलेंडरच्या तुलनेत खूप स्वस्त पडेल. त्यामुळे सामान्य कुटुंब आणि हॉटेल व्यावसायिकांचा खर्च कमी होईल. केरोसिन, लाकूड आणि कोळशाच्या तुलनेत इथेनॉल पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा आहे. कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन उत्सर्जनाच प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे घराच्या आत शुद्ध हवा राहते.भारत जवळपास 85 टक्के कच्चं तेल आणि एलपीजी आयात करतो. दरवर्षी आयात बिलापोटी लाखो कोटी रुपये देशाबाहेर जातात. इथेनॉलमुळे हा आर्थिक ताण कमी होईल.