
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अशीच काहीशी परिस्थिती या एक प्रकरणात घडली. एसबीआयच्या एका ग्राहकासोबत हा प्रकार घडला. ज्यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय एक लाखांहून अधिक रुपये काढून हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण ग्राहक आयोगापर्यंत पोहोचले, ज्याने बँकेला आदेश दिलेत की ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी.
या प्रकरणात, दिल्ली राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने बँकेला ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला, ज्यामध्ये ₹१.३० लाख परत करणे आणि अतिरिक्त ₹१०,००० देणे यांचा समावेश आहे. शिवाय, हे प्रकरण १२ ऑक्टोबर २०१८ रोजीचे असल्याने, आयोगाने त्या तारखेपासून रकमेवर ६% वार्षिक व्याज देण्याचाही आदेश दिला.
एकाच दिवसात ग्राहकाच्या खात्यातून चार एटीएम व्यवहार झाले, ज्यात ₹८०,००० काढण्यात आले. याशिवाय, ₹४०,००० आणि ₹१०,००० चे दोन स्वतंत्र बँक हस्तांतरण देखील करण्यात आले. ग्राहकाच्या खात्यातून एकूण ₹१.३० लाख काढण्यात आले.
पैसे कोणी काढले हे ओळखण्यासाठी ग्राहकाने बँकेकडे एटीएम व्यवहारांच्या सीसीटीव्ही फुटेजची विनंती केली. असे असूनही, एसबीआयने ग्राहक आयोगाला व्यवहारांशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज किंवा नोंदी देवू शकली नाही.
जेव्हा ग्राहकाने आपले पासबुक अपडेट केलं, तेव्हा त्याच्या लक्षात आले की काही दिवसांपूर्वी त्याच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली होती. त्यानंतर त्याने बँकेकडे तक्रार दाखल केली, जी नंतर दिल्ली राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे पाठवण्यात आली.
तुमच्या बँक खात्यातून एखादा अज्ञात व्यवहार झाल्यास, तुमच्या बँकेला तात्काळ कळवा.
एटीएम फसवणूक झाल्यास, तुमचे कार्ड तात्काळ ब्लॉक करा.
व्यवहाराचा तपशील, जसे की तारीख, रक्कम आणि वेळ, लिहून घ्या.
बँकेकडे लेखी तक्रार दाखल करा.
पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करा.
आवश्यक असल्यास, बँकेकडून व्यवहाराच्या नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेज मागा.
व्यवहाराशी संबंधित सर्व पुरावे जपून ठेवा.
जर बँक तुमचे म्हणणे ऐकून घेत नसेल किंवा समस्येवर तोडगा काढत नसेल, तर तुम्ही ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकता.
India Electricity Export : भारत बनला ‘पावर हाऊस’! ‘या’ देशांना वीज पुरवून कमावतोय कोट्यवधी रुपये