
ग्राहकांसाठी दिलासा! ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले; टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी
दर कमी झाल्याने फळ खाणाऱ्यांना, आता फळे खरेदी करताना खिसा तपासावा लागणार नाहीये.पुढच्या महिन्यापर्यंत असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
टरबूज – 35 रुपयांवरून आता 25 रुपये,
कलिंगड – 120 रुपयांवरून आता 50 रुपये
द्राक्ष – 150 रुपयांवरून आता 100 रुपये
पपई – 30 रुपयांवरून आता 20 रुपये
कलिंगडाच्या तर बाजारात दररोज चाळीस पंचेचाळीस गाड्या येत आहेत. आवक जास्त होत असल्याने बाजारात कलिंगडाची जात पूर्णपणे कमी झाले आहे. दोन आठवडवापूर्वी घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किली असणारा कलिंगड आता मात्र दहा ते पंधरा रुपये किलो झाला आहे. ३० ते ३५ रुपये किलो असणारा टरबूज १८ ते २५ रुपये किलो झाला आहे. २० ते ३० रुपये किलो असणारा पपई १५ ते २० रुपये किलो झाला आहे.
भाऊ बाजारात दर कमी झाले असल्याने किरकोळ बाजारामध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी एक कलिंगड १०० ते १२० रुपयांना खरेदी करावा लागत होता. तो आता किरकोळ बाजारात पन्नास रुपयात मिळत आहे. हीच परिस्थिती इतर फळांच्या बाबतीतही आहे. बाजारात आता द्राक्षांची ही आवक वाढत आहे त्यामुळे घाऊक बाजारात द्राक्ष सरासरी शंभर रुपये किलोध्या घरात आहेत. किरकोळ बाजारात द्राक्षे दीडशे रुपये किलो पर्यंत उपलब्ध झाली आहे. यापूर्वी द्राक्षे २०० ते २५० रुपये किलो होती.