
cbse
CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईने त्रिभाषा धोरणाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गोंधळ दूर झाला आहे. या वर्षी इयत्ता ७वी, ८वी, ९वी आणि १० वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. थोडक्यात, या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे तात्कालीन व्यवस्थेनुसारच चालू राहील.
बोर्डाच्या निर्देशानुसार, सध्याच्या १० वीच्या विद्यार्थ्यांवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाणार नाही, या बदलामुळे विद्यार्थ्यामधील अतिरिक्त विषयाच्या अभ्यासाचा दबाव राहणार नाही.
सीबीएसई आता नवीन भाषा प्रत्येक वर्षासाठी टप्प्याटप्प्याने लागू करेल. ज्यामुळे विद्यार्थ्यावर नवीन भाषेच्या अध्यायनाचा अतिरिक्त दबाव येणार नाही.
यंदा (सत्र २०२६-२७) १० वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ दोन भाषांचाच अभ्यास करावा लागेल. त्यांना तिसऱ्या भाषेच्या विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. परंतु, यंदा ९ वीच्या (सत्र २०२६-२७) विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. ज्यामध्ये दोन भारतीय भाषांचा (उदा – हिंदी आणि मराठी) समावेश असेल तर तिसरी भाषा ते परदेशी (उदा – इंग्रजी, फेंच) निवडू शकतात. तसेच जर विद्यार्थी दोन परदेशी भाषा शिकत असेल तर त्याला तिसऱ्या भारतीय भाषेची अभ्यासासाठी निवड करावी लागेल.
यामध्ये यंदाच्या ९ वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. त्या तिसऱ्या भाषेच्या विषयाचे मूल्यांकन केवळ माध्यमिक पातळीवर केले जाईल. परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार, यंदा ६ वीच्या इयत्तेत शिकत असणारे विद्यार्थी, जेव्हा १० वीची बोर्ड परीक्षा देतील. तेव्हा त्यांना तिसऱ्या भाषेची परीक्षा देणे अनिवार्य असेल.
सीबीएसईने, या नव्या नियमातून काही विशिष्ट घटकांना सूट दिली आहे. यामध्ये दिव्यांग (CwSN) विद्यार्थ्यांना कायद्यानुसार सूट मिळेल तसेच परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकावी लागणार नाही.