फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Exam reforms task force India : केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक मोठे पाऊल उचलले आहे, आता विद्यार्थी पालक शिक्षक शैक्षणिक संस्था आणि नागरिक संघटनांकडून नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या टास्क फोर्सने सूचना मागवल्या आहेत. याचा उद्देश परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक तयार करणे आहे. टास्क फोर्स ही एनटीएच्या परीक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करत आहे, यामध्ये परीक्षा प्रणालीशी संबंधित सर्व घटकांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेपर लीक आणि परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी उत्तम संस्थात्मक व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराशी निगडीत सूचनाही मागवल्या आहेत.
सरकारने सूचना पाठवण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर निश्चित केली आहे. विद्यार्थी आणि भागधारक आपल्या प्रादेशिक भाषेतही आपले मत मांडू शकतात. त्यांच्या सोईसाठी सरकारने वेबसाइट फोन व्हॉट्सअॅप आणि ईमेल यांसारखे माध्यम उपलब्ध करून दिले आहेत.
लोक examreforms-taskforce.dopt.gov.in या वेबसाईटद्वारे किंवा 1800-180-4747 या क्रमांकावर फोन करून आपल्या सूचना देऊ शकतात.
तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून 7827042830 या क्रमांकावर ‘hptf’ लिहून सूचना देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राप्त सूचनांच्या आधारावर टास्क फोर्स सरकारला आपल्या शिफारसी सादर करेल.
केंद्र सरकारने जुलेैमध्ये नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून यामध्ये गुप्तचर यंत्रणेची माजी संचालक तपन डेका, इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी, पूर्व शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स तज्ञ अमृत लाल मीणा यांचा समावेश आहे.
अलीकडेच एनटीएने संचालक पदांसाठी अधिकारी IPS रवी कुमार सिंह आणि IAS अधिकारी प्रसन्ना वेंकटेश व्ही यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IRS अधिकारी अमित समदरिया यांना सहसंचालक बनवण्यात आले आहे.
परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी पेपर लीकच्या वादानंतर तीव्र झाली. याच पार्श्वभूमीवर, परीक्षेची सुरक्षा, तांत्रिक देखरेख, पेपरची गोपनीयता आणि परीक्षा संचालन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सरकारने अँटी पेपर लीक कायद्यात बदल करत त्याची व्यापकता वाढवण्यावर भर दिला आहे.
NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू
नीट युजी संबंधित पेपर लीक वादानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून कागदपत्रांनुसार आतापर्यंत CBI ने १३ आरोपींना अटक केले आहे.सध्या सरकारसमोर परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान आहे.
टास्क फोर्सच्या उपक्रमात विद्यार्थी आणि पालकांच्या मतांना महत्त्वाचे स्थान दिले जात आहे, कारण परीक्षा व्यवस्थेचा थेट प्रभाव त्यांच्यावर पडतो. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे टास्क फोर्सला सरकारपुढे सुधारणांच्या शिफारसी करण्यास मदत होईल.






