
rbi
First Governor of RBI Sir Osborne Smith: जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकिंग प्रणालीवर चर्चा होते. तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) उल्लेख नेहमीच प्रथम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे भारतीय नव्हे तर ऑस्ट्रेलियन बँकर होते. चला तर मग जाणून घेऊया आरबीआयबद्दलची सविस्तर माहिती..
आरबीआयची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. त्यावेळी सर ऑस्बॉर्न स्मिथ यांची पहिल्या गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली. सर स्मिथ हे लहानपणापासूनच बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी बँक ऑफ न्यू ऑस्ट्रेलियामध्ये २० वर्ष सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी भारताच्या सर्वात मोठ्या बँकिंग प्रणालीपैकी एक मानल्या जाणाऱ्या इम्पीरियल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय गव्हर्नर पदाची जबाबदारी संभाळली. यावेळी त्याच्या कार्याचे कौतुक भारतातच नव्हे तर ब्रिटिश राजवटीतही झाले. यावेळी त्याना ‘नाइट’ पदवी बहाल करण्यात आली.
पगाराबद्दल बोलायचे झाल्यास त्यावेळच्या आरबीआय गव्हर्नरला दरमहा अंदाजे २०,००० रू पगार मिळत असे. जी त्यावेळच्या काळातली सर्वात मोठी रक्कम मानली जात होती. तसेच पगाराव्यतिरिक्त त्यांना निवास, शासकीय वाहन, कर्मचारी वर्ग आणि यासारख्या आवश्यक सुविधा दिल्या जात होत्या. यावरूनच त्या पदाची प्रतिष्ठा दिसून येते.
सर ऑस्बॉर्न स्मिथ यांचा आरबीआय गव्हर्नर म्हणून कार्यकाळ अल्प होता. परंतु गव्हर्नर म्हणून त्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे पार पाडली. त्यांनी बँकिंग प्रणालीला योग्य दिशा देऊन त्याला मजबूत करण्याचे कार्य केले. जेणेकरून लोकांचा बँकेवर विश्वास बसेल. तसेच त्यांनी चलन प्रणालीची स्थिरता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे वित्तीय प्रणाली मजबूत होण्यास मदत झाली. परंतु काही मुद्द्यांवर ब्रिटिश सरकारशी मतभेद झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
आज आरबीआय भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. देशातील व्याजदर, महागाई कशी नियंत्रित करायची आणि बाजारात किती पैसा प्रवाहित करायचा? यासारखे महत्त्वाचे निर्णय आरबीआय घेत असल्याने तिला देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असेही म्हटले जाते. याव्यतिरिक्त देशातील सर्व बँकांवर देखरेख ठेवण्याचे आणि त्यांना नियमांचे पालन करण्यासाठीचे आदेश आरबीआय देते. इतकेच नव्हे तर आर्थिक स्थिरता राखण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका आरबीआय बजावते.