
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Independence day : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) दादर, मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ विभाग संघचालक रवींद्र संघवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अभाविपचे केंद्रीय कार्यालय मंत्री अनूपसिंह ठाकूर आणि मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांची विशेष उपस्थिती लाभली.
उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र संघवी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘वंदे मातरम्’ या मंत्राच्या प्रेरणादायी भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला.
“राष्ट्रभावना, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता हीच देशाच्या सशक्त भविष्याची खरी पायाभरणी आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा पिढीची भूमिका अत्यंत निर्णायक असून, प्रत्येक तरुणाने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपावी.”
– रवींद्र संघवी (परळ विभाग संघचालक, रा. स्व. संघ)
देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेच्या भावनेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या कार्यक्रमास अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.