शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर
यापुढे मात्र ते एकत्रित म्हणजेच एकाच कागदावर दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फाईलमधील बोझा कमी होणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दस्ताऐवज सांभाळणे सोपे व्हावे, यासाठी शिक्षण मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थी ज्या काही पदवी व पदविका प्राप्त करता, त्यासाठी बोर्ड व विद्यापीठाकडून गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्ररित्या दिले जाते.
यामुळे विद्यार्थ्यांच्या फाईल वरील बोजा वाढतो. तसेच हे गुणपत्रक व प्रमाणपत्र सांभाळणे देखील कठीण जाते. याशिवाय प्रवेश प्रक्रिया व अन्य कामांसाठी गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या खूप साऱ्या झेरॉक्स प्रति देखील काढाव्या लागत असल्याने अधिकचे पैसे देखील खर्च होतात. मात्र दहावी बारावी बोर्डाकडून आता गुणपत्रक व प्रमाणपत्र एकाच कागदावर मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फेब्रुवारी मार्च २०२६ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन बदल लागू राहणार असल्याचे मंडळाने रूष्ट केले आहे. मंडळाने सर्व विभागीय मंडळांना या नवीन प्रक्रियेची अंमलबाजवणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच नावाच्या क्रमातही बदल केला जाणार आहे. यापुढे गुणपत्रकावर विद्याथ्यांचे नाव प्रथम्, त्यानंतर वडिलांचे नाव आणि सर्वात शेवटी आडनाव छापले जाणार आहे. यामुळे नावाच्या सुसूत्रतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया देखील सुलभ होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील (हॉल तिकीट) वरील फोटो अस्पष्ट होते आणि ज्यांचे फोटो मुख्याध्यापकांनी दुरुस्त केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर ‘फोटो करेक्शन’ हि लिंक सक्रिय करण्यात आली आहे.






