
pm modi
PM Modi Mann Ki Baat 134th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ मासिक रोडियो कार्यक्रमाच्या १३४ व्या भागातून देशवासीयांना संबोधित केले आहे. या दरम्यान त्यांनी देशभरात सुरू असलेल्या प्रेरणादायी सामाजिक कार्यांचा उल्लेख केला. यामध्ये गोवा आणि तमिळनाडूशी संबंधित अशा दोन गोष्टी समोर आल्या ज्यातून देशभक्तीची भावना आणि समाजसेवा अधोरेखित झाली.
बालकृष्ण अय्या हे जरी निवृत्त शिक्षक असले तरी समाजसेवेची त्यांची आवड आजही तशीच कायम आहे. यांनी गोव्यातील मड्डी तोलाप या भागात उदभवणाऱ्या पाणी टंचाईच्या प्रश्नाच्या निराकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी स्वत: पुढे होऊन पाईपलाईन टाकण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचवण्यास मदत केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे या भागातील अनेकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर झाले आहे.
तामिळनाडूच्या नागरकोइल येथील गिरिचा अम्मा यांचेही काम हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्या जवळापास १५ शाळा चालवतात. ज्यामध्ये चेन्नईचे ‘जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय’ हे प्रमुख आहे. त्यांनी शिक्षणाची संगड देशभक्तीशी घालत विद्यार्थ्यांना देशाच्या सैनिकांसाठी योगदान देण्यास प्रवृत्त केले. विशेष म्हणजे ही मोहीम ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रेरित होऊनच सुरू केली होती.
गिरीजा अम्मा यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या जवानामध्ये रोज केवळ १ रूपया देण्याचे आवाहन केले होते. या छोट्याशा योगदानातून तब्बल ४० लाख रूपयांचा निधी जमा झाला, जो नंतर सैनिकांच्या कल्याणासाठी समर्पित करण्यात आला. हे उदाहरण दर्शवते की, एक छोटासा प्रयत्न देशासाठी किती मोठे योगदान ठरू शकतो.
हा संदेश आपल्याला हीच शिकवण देतो की, देश हितासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय निष्काम कार्य करत रहावे. मग हा प्रयत्न पाण्याच्या समस्येचा असो किंवा विद्यर्थ्यांना देशभक्तीसाठी प्रेरित करणे असो. पंतप्रधान मोदींनीही या प्रयत्नाचे भरभरून कौतुक करत म्हटले की, भारताची खरी ताकद तिची जनताच आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी अशा सामाजिक प्रयत्नांना ओळखावे. त्यांचे कौतुक करावे आणि स्वत: देखील समाजसेवेशी जोडले जावे.