School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
फक्त नियम काढून हा प्रश्न सुटणार नाही, म्हणून शिक्षण विभागाने सांगितले आहे की, प्रत्येक शाळेने मुलांच्या दप्तरांचे वजन तपासावे. तसेच मुख्याध्यापकांनी सुद्धा यावर लक्ष द्यावे. कोणताही मुलगा- मुलगी जास्तीच्या वह्या किंवा पुस्तके तर आणतं नाहीये ना.. असं करत असेल तर सगळी पुस्तक आणू नका असं सांगण्यात यावे.
ज्या विषयाचा तास आहे. त्याच विषयाची पुस्तके आणावी. एक्स्ट्रा साहित्यावर सक्ती करण्यात यावी असं स्पष्ट सांगण्यात आले आहे. प्राथमिक आणि माध्यामिक शाळेच्या मुलांना जास्त त्रास होते, त्यांना दररोज सगळ्या विषयाची पुस्तके आणावी लागतात. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आणि पाठीला त्रास होतो. त्यासाठी शाळांनी आपलं वेळापत्रक बदलावे, असे विभागाने सांगितले आहे.
विभागाने पुढे हे सांगितले की, शाळांनी असे वेळापत्रक तयार करा की, मुलांना दररोज सगळी पुस्तके आणावी लागणार नाही. दाहरणार्थ सोमवारी 4 विषय असतील तर त्याच 4 विषयांची पुस्तकं आली पाहिजेत. मंगळवारी वेगळे विषय. असं केलं तर दप्तर आपोआप हलकं होईल. हे नियोजन करण्याची जबाबदारी आता शाळांची आहे.केंद्र सरकारने पण सूचना दिल्या होत्या.
केंद्राच्या शालेय शिक्षण विभागाने 11 ऑगस्टला सगळ्या राज्यांना याबत मार्गदर्शक सूचना पाठवल्या होत्या. केंद्राने सांगितलं होतं की जड दप्तरामुळे मुलांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. पाठदुखी, खांदेदुखी, थकवा असे त्रास लहान वयातच सुरू होतात. त्यामुळे शाळांनी फक्त वजनावर लक्ष ठेवू नये तर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता पण करावी.गेल्या काही वर्षांपासून पालक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक हा मुद्दा लावून धरत होते.






