Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा निघावा; हिंसक संघर्ष दुर्दैवी! काय आहे विद्यार्थी परिषदेचं म्हणणं?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ने चिंता व्यक्त करत संवाद आणि संस्थात्मक सुधारणांतूनच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, अशी भूमिका मांडली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ने दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट-यूजीसह विविध शैक्षणिक प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचे निराकरण संवाद, पारदर्शकता आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून व्हावे, अशी भूमिका अभाविपने मांडली आहे. आंदोलनाच्या आड काही अराजक प्रवृत्ती आणि राजकीय स्वार्थी घटकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करत अशा प्रकारच्या घटनांचा निषेधही परिषदेने केला आहे.

UPSC Recruitment 2026: संघ लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण विभागात बंपर भरती! ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू

अभाविपने म्हटले आहे की, नीट-यूजीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात ती सुरुवातीपासून विद्यार्थ्यांसोबत उभी आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेसमोर आंदोलन अशा विविध माध्यमांतून परिषदेने सातत्याने आवाज उठवला आहे. या घटनांमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रतीही अभाविपने संवेदना व्यक्त केल्या आहेत.

परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही अभाविपने केली आहे. स्पर्धा परीक्षांतील त्रुटी, पारदर्शकता आणि आवश्यक संस्थात्मक सुधारणांचा सर्वंकष आढावा घेऊन कालबद्ध शिफारसी सादर करण्याचे काम या समितीने करावे, असे परिषदेचे मत आहे. वेल्थ मॅनेजमेंटप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही गुणवत्ता आणि विश्वास टिकवण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांची गरज असल्याचे अभाविपने अधोरेखित केले आहे.

अभाविपने विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचा वापर राजकीय स्वार्थ, सामाजिक अस्थिरता किंवा राष्ट्रविरोधी अजेंड्यासाठी होऊ नये, असेही स्पष्ट केले. भारतातील विद्यार्थी समाज जागरूक असून लोकशाही मूल्ये, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे परिषदेने नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना भडकवण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर विधायक आणि संवेदनशील पद्धतीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे अभाविपने सांगितले आहे.

K C Mahindra Scholarship 2026: के. सी. महिंद्रा ट्रस्टकडून व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती जाहीर! ‘या’ विद्यार्थ्यांना मिऴणार लाभ

अभाविपचे मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी सांगितले की, नीट-यूजीसह विविध स्पर्धा परीक्षांतील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या न्याय्य प्रश्नांवर परिषद सुरुवातीपासून विद्यार्थ्यांसोबत असून, त्यांच्या मागण्यांचा वापर कोणत्याही राजकीय हेतूसाठी होऊ देणार नाही. परीक्षा प्रणाली अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

Web Title: What does the akhil bharatiya vidyarthi parishad have to say about lathi charge on students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?
1

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल
2

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन
3

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर
4

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.